महाराष्ट्र

maharashtra

Border Dispute : संजय राऊतांचे सीमावादावर मोठे विधान, म्हणाले...

By

Published : Dec 3, 2022, 3:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

अहमदनगर खासदार संजय राऊत तुरूंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच परिवारासह शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आले MP Sanjay Raut in Shirdi आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सुरू असलेल्या छत्रपती शिवरायांच्य अपमानाबद्दल महाराष्ट्रात जो रोष निर्माण झाला आहे त्याकडे दुर्लक्ष व्हावे, म्हणून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व केंद्र सरकारच्या मदतीने योजनाबद्ध हा वाद तयार केला गेला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर देखील टीका Sanjay Raut Critics केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details