बरेली : इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे (आयएमसी) राष्ट्रीय अध्यक्ष तौकीर रझा यांनी रविवारी रात्री फरीदपूर येथे एका जाहीर सभेत प्रक्षोभक भाषण केले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान म्हणाले की, 'तुम्हाला अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येचा आणि आझम खानच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे, हीच वेळ आहे एकत्र येण्याची. मला असे म्हणायचे आहे की, जेव्हा-जेव्हा मुस्लिमांवर अन्याय आणि अत्याचार झाले, तेव्हा त्याला समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्याइतकेच भाजप जबाबदार आहे. खान यांच्या अपमानाचा आणि अन्यायाचा बदला घ्यावा लागेल. अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येसाठी आणि आझम खान यांच्या अपमानासाठी समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव हे भाजप सरकारपेक्षा कमी जबाबदार नाहीत, असे मौलाना म्हणाले आहेत.