महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 11, 2019, 8:52 PM IST

ETV Bharat / state

मदत न करणाऱ्या सरकारला सत्ता द्यायचीच कशाला? - आंबेडकर

राज्यावर ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ आल्यावरही सरकार मदत करत नाही. मग त्यांना सत्ता द्यायचीच कशाला अशी टीका बाळासाहेब यांनी केली.

बाळासाहेब आंबेडकर

यवतमाळ- 'लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला होता. तसा घोटाळा या विधानसभा निवडणुकीत झाला नाही तर, आम्ही सत्तेवर येऊ', असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी 'ई-टीव्ही'शी बोलतांना व्यक्त केला.

बाळासाहेब आंबेडकर

हेही वाचा-वूहान परिषद ते महाबलीपूरम बैठक, भारत चीनमधील ज्वलंत प्रश्न 'जैसे थे'

सरकार मदत करत नाही, त्यांना सत्ता द्यायची कशाला? राज्यावर ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ आल्यावर सरकार मदत करत नाही. नागरिकांना खरी गरज ही संकटात असते. त्यावेळी सत्ताधारी पाठ फिरवतात. मग त्यांना सत्ता द्यायची कशाला, अशी टीका भाजप-सेना सरकारवर बाळासाहेब यांनी केली. भाजप व सेना यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details