महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यातील महाकाली धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

महाकाली धरणातील मंदिराचा कळस दिसायला लागला तेव्हापासून आकर्षण निर्माण झाले आहे. अनेक वर्षानंतर मंदिर उघडे पडल्याने लोक छातीच्यावर पाणी असतानाही दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.

By

Published : Jun 22, 2019, 9:50 AM IST

Updated : Jun 22, 2019, 1:22 PM IST

वर्ध्यातील महाकाली धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

वर्धा - जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील महाकाली धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या दुष्काळाने धरणातील मंदिर उघडे पडले आहे. त्यामुळे दर्शनासाठी गेला असता पोहण्याचा मोह आवरला नसल्याने त्याने उडी घेतली. मात्र, पाणी खोल असल्याने त्याचा मृत्यू झाला.

वर्ध्यातील महाकाली धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

गोपाल नागोसे (वय २८), असे या मृत तरुणाचे नाव आहे. महाकाली धरणातील मंदिराचा कळस दिसायला लागला तेव्हापासून आकर्षण निर्माण झाले आहे. अनेक वर्षानंतर मंदिर उघडे पडल्याने लोक छातीच्यावर पाणी असतानाही दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. त्याचप्रमाणे गोपाल शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास या मंदिरात दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे त्याने पाण्यात उडी घेतली. मात्र, पाणी खोल असल्याने तो पाण्यात बुडाला.

खरांगणा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शोधमोहीम राबवली. मात्र, अंधार झाल्यानंतरही मृतदेह सापडला नव्हता. अखेर हायमास्ट लावून शोधमोहीम राबवली. त्यानंतर रात्री उशिरा गोपालचा मृतदेह सापडला.

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी पाण्यात जाऊ नये, असे फलक लावले. मात्र, कोणीतरी हे फलक काढून पाण्यात फेकून दिले. सुचनांकडे दुर्लक्ष करत फलक फेकल्याने गोपालचा जीव गेला. याबाबत ठाणेदार संतोष शेगावकर यांनी दुःख व्यक्त केले. मात्र, आता तरी लोकांनी पाण्यात जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Last Updated : Jun 22, 2019, 1:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details