महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 29, 2020, 10:50 PM IST

Updated : Nov 29, 2020, 10:57 PM IST

ETV Bharat / state

शेतकऱ्यांवर अन्यायाची भूमिका घेणारे कायमस्वरूपी संपले - पालकमंत्री सुनील केदार

दिल्लीत ज्या लोकांनी शेतकऱ्यांच्या विचारधारेला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे. त्यांचा नायनाट लवकर होईल, अशी टीका केंद्रातील भाजप सरकारवर शेतकऱ्यांच्या आंदोलन माध्यमातून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी केली.

पालकमंत्री सुनील केदार
पालकमंत्री सुनील केदार

वर्धा / सेवाग्राम - भारत हा कृषी प्रधान देश आहे. या देशातील शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा भूमिका ज्यांनी कोणी घेतली आहे, त्यांचे राजकारण आणि समाजकारण कायमस्वरूपी संपल्याचा इतिहास राहिलेले आहे. दिल्लीत ज्या लोकांनी शेतकऱ्यांच्या विचारधारेला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे. त्यांचा नायनाट लवकर होईल, अशी टीका केंद्रातील भाजप सरकारवर शेतकऱ्यांच्या आंदोलन माध्यमातून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी केली. ते वर्ध्यात सर्वसेवा संघाच्या अधिवेशनात आले होते. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी टीकास्त्र सोडले.

वर्धा / सेवाग्राम

सर्वसेवा संघाचे पदाधिकारी 16 राज्यातून सहभागी होण्यासाठी सेवाग्रामच्या भूमीत आले होते. कस्तुरबा हॉलमध्ये 50 लोकांच्या उपस्थिती ही निवड प्रक्रिया पार पडली. यात बिनविरोध पश्चिम बंगालचे चंदनपाल यांची निवड अधिवेशनात घेण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर कोविड नियमाचे काटेकोरपणे पालन करत ही निवडणूक पार पडली. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले.राष्ट्रपिता महात्मा गांधींनी देशाच्या सामान्य माणसाला स्वतःच्या जीवनात स्वाभिमाने जगण्याची प्रेरणा दिली होती. भिऊ नका विचाराशी जुडून राहा याची पूर्ती करण्याचे काम या अधिवेशनाच्या आलेल्या अडचणींवर मात करण्याचे काम या सर्वोदयी लोकांनी केले आहे. यात अविनाश काकडे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे पालकमंत्री केदार म्हणाले.
सहभागी न झालेल्या सदस्यांसाठी यात्री निवासात झाला स्वागत समारोह..
या अधिवेशनात न्यायाल्याच्या आदेशामुळे 50 पेक्षा जास्त लोक हजर राहू नये, असे आदेश होते. यामुळे 16 राज्यातून आलेले सर्वोदयी हे यात्री निवास इथे मुक्कामी होते. सेवाग्रामच्या यात्री निवासात सर्वसेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची नियुक्त झाल्याने सहभागी न झालेले सर्व प्रतीक्षेत होते. कस्तुरबा हॉलनंतर यात्री निवासात स्वागत झालेल्या निवडीची माहिती देण्यात आली. हे अधिवेशन कोविडमुळे ऐतिहासिक ठरले. 16 राज्यातून लोक सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.
नवनियुक्त अध्यक्ष चंदनपाल काय म्हणाले?


आज अध्यक्षांची निवड ही गांधी विचारधारेवर, सर्वोदयी विचारधाराने झाले. यात निवड बिनविरोध झाल्याने हा पदभार स्वीकारला. विरोध असता तर मी पदभार घेतला नसता असेही म्हणाले. येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या मुद्द्यावर सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे म्हणाले. महिला उतपिडन, पर्यावरण, संविधान 70 वर्ष पूर्ण यासह अनेक मुद्यांवर काम करणार असल्याचे म्हणाले. तसेच दिल्लीत सुरू असणाऱ्या किसान आंदोलनाला समर्थन असल्याचे म्हणाले. सर्वांनासोबत घेऊन यावर भूमिका स्पष्ट करू असेही ते म्हणाले.

यांची होती अधिवेशनाला उपस्थिती..

या अधिवेशनाला देशभरातील विविध राज्यातील सर्वसेवा संघाचे पदाधिकारी आले होते. तसेच पालकमंत्री सुनील केदार, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, यासह जलपुरुष राजेंद्र सिंग, अविनाश काकडे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.

Last Updated : Nov 29, 2020, 10:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details