महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्हासनगरात पावसामुळे विजेच्या तारेचा शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

ही घटना उल्हासनगरमधील सी ब्लॉक परिसरात घडली आहे. मनीष चौहान असे विजेचा तारांचा शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

By

Published : Aug 3, 2019, 9:40 PM IST

ठाणे

ठाणे- मंदिराच्या समोर हार फुल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा मुसळधार पावसामुळे विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगरमधील सी ब्लॉक परिसरात घडली आहे. मनीष चौहान असे विजेचा तारांचा शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

उल्हासनगरात पावसामुळे विजेच्या तारेचा शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

उल्हासनगरमधील सी ब्लॉक परिसरात एका मंदिराबाहेर मनीषचा हार फुल विक्रीचा व्यवसाय होता. मात्र, आज सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे उल्हासनगरमधील सखलभागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. त्यामुळे मृत मनीष हा हार फुल विक्री करत असलेल्या ठिकाणी पाणी कुठून येते, हे बघण्यासाठी तो शेजारीच असलेल्या मंदिराच्या पत्र्याच्या शेडवर चढला. यावेळी उच्च दाबाच्या विजेच्या तारांच्या संपर्कात तो आला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

मृत मनीष हा काही दिवसांपूर्वी रोजगाराच्या शोधात आपल्या मावशीकडे आला होता. तो नेहमीप्रमाणे मावशीला हार फुलांच्या दुकानात मदत करत होता. त्यातच आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत असल्याने मनीष मंदिराच्या शेडवर चढला आणि विद्युत वाहिनीच्या संपर्कात आला, आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी विद्युत पोल व उघड्यावर असलेल्या जीवघेण्या विजेच्या तारा हटवण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details