महाराष्ट्र

maharashtra

करोडो रुपये देऊन घेतलेल्या गाडीत एअर बॅग सिस्टम असून देखील मृत्यू का?

By

Published : Sep 5, 2022, 10:10 PM IST

Updated : Sep 5, 2022, 10:50 PM IST

एखाद्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक करोडो रुपयांचं वाहन घेऊन देखील आपला जीव अपघातामध्ये वाचवू शकत नाही हे कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे. मुख्य म्हणजे या संपूर्ण वाहनातील एअर बॅग उघडून देखील वाहनातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एखादि आलिशान गाडी घेताना माणूस करोडो रुपये खर्च करत असतो. मात्र असे असून देखील जर अशा अपघात किरकोळ अपघातात जीव जात असतील तर कार कंपन्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर एअरबॅग उघडून देखील माणसाचा मृत्यू होत असेल तर हे संशयास्पद आहे. याकडे प्रशासनाने देखील लक्ष देऊन चौकशी करायला हवी असे कार एक्सपर्ट महेश मोरे यांचं म्हणणं आहे.

करोडो रुपये देऊन घेतलेल्या गाडीत एअर बॅग सिस्टम असून देखील मृत्यू का
करोडो रुपये देऊन घेतलेल्या गाडीत एअर बॅग सिस्टम असून देखील मृत्यू का

ठाणेदेशभरात अपघाती मृत्यूमध्ये मृत्युमुखी होणाऱ्या लोकांची संख्या दरवर्षी लाखोमध्ये आहे. असं असताना वाहनांची सेफ्टी हे देखील एक महत्त्वाचं कारण मृत्यू मागे आहे. करोडो रुपयांची वाहन घेऊन देखील ते जीव वाचू शकत नाही. अशाच घटना मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत घडल्या असून त्यांच्या मृत्यू नंतर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

करोडो रुपये देऊन घेतलेल्या गाडीत एअर बॅग सिस्टम असून देखील मृत्यू का

एखाद्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक करोडो रुपयांचं वाहन घेऊन देखील आपला जीव अपघातामध्ये वाचवू शकत नाही हे कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे. मुख्य म्हणजे या संपूर्ण वाहनातील एअर बॅग उघडून देखील वाहनातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एखादि आलिशान गाडी घेताना माणूस करोडो रुपये खर्च करत असतो. मात्र असे असून देखील जर अशा अपघात किरकोळ अपघातात जीव जात असतील तर कार कंपन्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर एअरबॅग उघडून देखील माणसाचा मृत्यू होत असेल तर हे संशयास्पद आहे. याकडे प्रशासनाने देखील लक्ष देऊन चौकशी करायला हवी असे कार एक्सपर्ट महेश मोरे यांचं म्हणणं आहे.

ताजी घटनाटाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची कार पालघर जिल्ह्यात दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला आहे. रविवारी झालेल्या अपघातात मिस्त्री जागेवरच ठार झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. मिस्त्री हे मर्सडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते असे त्यांनी सांगितले. यावेळी दुपारी तीन वाजून १५ मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. सूर्य नदीवरील पुलावर हा अपघात झाला. सर्व जखमींना गुजरात मधील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

Last Updated : Sep 5, 2022, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details