ठाणे :महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील 5 रुग्ण हे सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. हे रुग्ण हलवण्यात आल्यानंतर आता कळवा आणि सामान्य अशा दोन्ही रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील बेड पूर्णपणे भरले आहेत. दोन्ही रुग्णालयातील ठिकाणी अतिदक्षता विभागातील बेड तात्काळ वाढवले गेले नाही, तर पुन्हा गंभीर परस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
आयसीयू झाले पूर्ण भरले : ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात मृत्यूचे प्रकरण झाल्यानंतर रुग्णालयातील बेड वाढवण्यासंदर्भात उपाय योजनांवर भर देण्यात येत आहे. मात्र याची अंमलबजावणी तातडीने होणे तूर्तास शक्य नाही. दुसरीकडे कळवा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील बेड्स आधीच भरले आहेत. त्यामुळे कळवा रुग्णालयातील 5 रुग्ण हे सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहेत. कळवा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची क्षमता ही 40 बेडची आहे. सध्या या ठिकाणी 39 रुग्ण दाखल आहेत. तर सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची क्षमता ही 24 बेड्सची आहे. कळव्यातील पाच रुग्ण या ठिकाणी हलविण्यात आल्यानंतर आता सामान्य रुग्णालयाचीही क्षमता संपली आहे. आता नवा गंभीर स्वरूपाचा रुग्ण आल्यास त्याला दाखल कुठे करायचा, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन बालकांचा मृत्यू: कळवा रुग्णालयात मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी अजून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. एका मुलाला रुग्णालयात जेव्हा आणण्यात आले त्यावेळीच या बाळाचा मृत्यू झाला होता. तर एका बाळाच्या हृदयाला वॉलची समस्या असल्याने 20 मिनिटातच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. या दोन्ही मृतांची नावे सांगण्यास मात्र रुग्णालयाने नकार दिला आहे. तर परिस्थिती गंभीर होईल.