महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्ली दंगलीसाठी काँग्रेस आणि आप जबाबदार - रामदास आठवले

खासदार रामदास आठवले हे ठाण्यातील मो.ह. विद्यालयात शांताबाई कृष्णा कांबळे यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, मनसेचे राज ठाकरे यांनी जर प्रांतवादाची भूमिका सोडली तर त्यांचे महायुतीत स्वागत आहे. परंतु, ते येण्या न येण्याने महायुतीला काही फरक पडणार नाही, असे आठवले यांनी सांगितले.

By

Published : Mar 1, 2020, 11:32 PM IST

ramdas athawale in thane
कार्यक्रमाचे दृश्य

ठाणे- दिल्लीमधील दंगलीला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहे. त्यांनी ठरवले असते तर ही दंगल नियंत्रणात येऊ शकली असती. त्याचबरोबर, ज्या संजय राऊतमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले त्यांच्यावर पक्षाने अन्याय केला आहे. किमान त्यांना सामनाचे संपादक पद तरी द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले

खासदार रामदास आठवले हे ठाण्यातील मो.ह. विद्यालयात शांताबाई कृष्णा कांबळे यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, मनसेचे राज ठाकरे यांनी जर प्रांतवादाची भूमिका सोडली तर त्यांचे महायुतीत स्वागत आहे. परंतु, ते येण्या न येण्याने महायुतीला काही फरक पडणार नाही, असे आठवले यांनी सांगितले. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाने जर ठरविले असते तर दिल्लीची दंगल भडकली नसती. परंतु, आम आदमी पक्षाच्या नगरसेवकाने ही दंगल भडकवली. काँग्रेसने ती आणखीनच भडकवली, असा आरोप आठवले यांनी केला. केंद्रात आमचे सरकार असल्याने दंगलीसाठी आम्ही कसे जबाबदार? असा सवालही आठवले यांनी आरोप करणाऱ्यांना केला.

मुंबई महानगर पालिका निवडणुकीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की रिपाई पक्षाचा लवकरच मेळावा होणार आहे. येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेत रिपाई पूर्ण ताकदीने भाजपसोबत राहून शिवसेनेला पराभूत करणार आहे. मुंबईचा २०२२ चा महापौर भाजपचाच असेल. तसेच नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत रिपाईला ५-६ जागा हव्या आहेत. इथेही महायुतीचाच महापौर असेल, असा विश्वाससुद्धा आठवले यांनी व्यक्त केला आहे. पक्ष औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूकही सन्मानाने लढणार असून इथेही महायुतीची सत्ता असणार असल्याचे आठवले म्हणाले. तर, औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपाईचा विरोध असून कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असे पक्षाला वाटते. मात्र, राज्य शासनाने जर ठरविले तर नावात बदल केला जाऊ शकतो.

हेही वाचा-अल्पवयीन मुलीशी जीममध्ये अश्लील चाळे करणारा विकृत प्रशिक्षक गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details