ठाणे - उल्हासनगर शहरातील वालधुनी नाल्यात शुक्रवारी दुपारी एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शितल साळवे असे मृतक विवाहितेचे नाव असून शीतलची आत्महत्या की हत्या? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
विवाहितेचा मृतदेह सापडला ठाण्याच्या वालधुनी नाल्यात, हत्या की आत्महत्या याबाबत संभ्रम
शहरातील वालधुनी नाल्यात शुक्रवारी दुपारी एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शितल साळवे असे मृतक विवाहितेचे नाव असून शीतलची आत्महत्या की हत्या? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शीतल उल्हासनगर कँम्प क्र. ५ लालचक्की येथील महात्मा फुले नगर येथे राहत होती. ८ दिवसांपूर्वीच तीने एका चिमुकलीला जन्म दिला असून शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास ती घराबाहेर निघून गेली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र, दुपारी वालधुनी नाल्यात शीतलचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह नाल्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. मात्र, शीतलने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - सुप्रिया सुळेंसोबत गैरवर्तन प्रकरण; ठाण्यातील राष्ट्रवादी आघाडीच्या महिलांनी काळ्या साड्या घालून केला निषेध