महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 17, 2020, 7:19 AM IST

ETV Bharat / state

ठाण्यात गुरुवारी 413 कोरोनाबाधितांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 62 हजार 398 वर

बुधवारी 400 बाधितांची नोंद करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 62 हजार 398 वर पोहोचली आहे. तर एकूण 1 हजार 774 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 37 हजार 374 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मनपा क्षेत्रातील मृतांची 523 वर गेली आहे.

thane corona update
ठाणे कोरोना अपडेट

ठाणे - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात गुरुवारी 413 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 340 जणांनी कोरोनावर मात केली. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी 400 बाधितांची नोंद करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 62 हजार 398 वर पोहोचली आहे. तर एकूण 1 हजार 774 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 37 हजार 374 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मनपा क्षेत्रातील मृतांची 523 वर गेली आहे.

ठाण्याच्या नऊ प्रभाग समितीत गुरुवारी आढळलेली रुग्णसंख्या -

  • माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत - 83; बुधवारच्या तुलनेत 3 रुग्णांची वाढ
  • वर्तकनगर प्रभाग समिती - 48
  • लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती - 51
  • नौपाडा-कोपरी प्रभाग समिती - 66
  • उठलसार प्रभाग समितीत 54; बुधवारच्या तुलनेत 9 रुग्णांची वाढ
  • वागळे प्रभाग समिती - 23; बुधवारच्या तुलनेत 9 रुग्णांची वाढ
  • कळवा प्रभाग समिती - 63; बुधवारच्या तुलनेत 9 रुग्णांची वाढ
  • मुंब्रा प्रभाग समितीत - 6; बुधवारच्या तुलनेत 9 रुग्णांची घट
  • दिवा - 16; 5 रुग्णांची घट झाली आहे.
  • प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 6 हजार 28
  • बरे झालेल्यांची संख्या 8 हजार 281

दरम्यान, कल्याण-डोंबवली पालिकेच्या हद्दीतील बाधितांची संख्या 6 हजार 208 आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 8 हजार 165 आहे. याठिकाणी आतापर्यंत 225 बाधितांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई पालिका हद्दीतील रुग्णांची संख्या 3 हजार 704 इतकी आहे. तर 6 हजार 520 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याठिकाणी 322 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मीरा-भायंदर पालिकेतील कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 217 आहे. बरे झालेल्यांची संख्या 4 हजार 645 रुग्ण आहेत. तर 213 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

उल्हासनगर पालिकेच्या हद्दीत रुग्णांची संख्या 2 हजार 185 इतकी आहे. तर 2 हजार 788 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. येथे 74 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

भिवंडी महापालिकेच्या हद्दीत एकूण 670 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. येथील बरे झालेल्यांची संख्या 2 हजार 130 इतकी आहे. याठिकाणी 167 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीत रुग्णांची एकूण संख्या 474 आहे. येथे 2 हजार 285 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर 111 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

बदलापूर नगरपरिषदेच्या परिसरात 812 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 871 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याठिकाणी 20 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच ठाणे ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 972 इतकी आहे. तर 1 हजार 689 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 99 जणांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details