महाराष्ट्र

maharashtra

मराठा समन्वयकांची जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ, उद्या आक्रोश मोर्चा निघणारच

By

Published : Nov 6, 2020, 7:31 PM IST

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, उद्याच्या नियोजित मोर्चापूर्वीच पोलीस प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली. यावरून मराठा समजातातून प्रशासनाकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच आज झालेली मराठा समन्वयक आणि जिल्हाधिकारी यांची बैठक निष्फळ झाली. त्यानंतर मराठा समाज आंदोलनावर ठाम राहिला आहे.

उद्या आक्रोश मोर्चा निघणारच
उद्या आक्रोश मोर्चा निघणारच

पंढरपूर (सोलापूर)-आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या वतीने शनिवारी पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू करत परवानगी नाकारली आहे. पंढरपुरात मराठा आंदोलकांना मोर्चा काढण्यासाठी आणि जर आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका स्पष्ट करणार असेल तर आंदोलन माघार घेण्यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासोबत बैठक झाली होती. मात्र, ती बैठक निष्फळ ठरली आहे. त्यानंतरही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आक्रोश मोर्चा काढण्याच्या निर्णय ठाम असून पंढरपुरातून मोर्चा निघणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, उद्याच्या नियोजित मोर्चापूर्वीच पोलीस प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली. यावरून मराठा समजातातून प्रशासनाकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच मोर्च्याची सहभागी होण्याकरीता 50 जणांना पंढरपुरात एकत्र येण्याची परवानगी मागितली होती. मात्र पोलीस प्रशासनाप्रमाणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देखील परवानगी नाकरल्याने आज झालेली मराठा समन्वयक आणि जिल्हाधिकारी यांची बैठक निष्फळ झाली. त्यानंतर मराठा समाज आंदोलनावर ठाम राहिला आहे.

उद्या आक्रोश मोर्चा निघणारच

पंढरपुरातून उद्या आक्रोश मोर्चा निघणारच-

मराठा क्रांती मोर्चा मोर्चाची सुरुवात पंढरपूर येथील नामदेव पायरीला नतमस्तक करून होणार आहे. त्यानंतर पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे. मात्र, यावेळी पोलीस प्रशासनाने बळाचा वापर न करता हे आंदोलन शांततेत करू द्यावी, अशी मागणी मराठा राज्य समन्वयक महेश डोंगरे, धनाजी साखळकर यांनी केली. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नोटीस फाडून राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाचा मराठा क्रांती मोर्चा कडून निषेधही व्यक्त करण्यात आला.

त्यास सरकार जबाबदार राहील-

महेश डोंगरे म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला बैठकीच्या नावाखाली या पत्रावळ्या दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पत्रवळ्या फाडून आम्ही निषेध व्यक्त करतो. मराठा क्रांती मोर्चाकडून पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा निघणारच आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक मराठा समाजाच्या युवकांनी बलिदान दिले आहे. आरक्षणाचे हे आंदोलन राज्यभरातून चालू आहे. मात्र, राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाकडून दबावाचा वापर झाला तर त्याचे पडसाद राज्यभर उमटतील आणि त्यास पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा डोंगरे यांनी दिला.

एसटी सेवा बंद राहणार-

पंढरपूर येथे 6 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. या संचारबंदीच्या काळात एसटी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. पंढरपुरात नामदेव पायरी, विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा घाट, प्रदक्षणा मार्ग ते चौफाळा या भागात मोठा पोलीस बंदोबस्त असण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details