सोलापूर- कोरोना व्हायरसच्या भितीमुळे इराक आणि इराण या देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. यामुळे तीर्थ यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील ६०० भाविक इराणच्या तेहेरानमध्ये अडकले आहेत. यात अकलूजचे १२ तर सांगोला तालुक्यातील १४ भाविकांचा समावेश आहे.
शिया पंथियांसाठी पवित्र मानल्या गेलेल्या इराक आणि इराणमधल्या धर्मस्थळांच्या दर्शनासाठी हे भाविक तिथे गेले होते. त्याच दरम्यान कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने त्या देशांनी आपल्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. यामुळे हे भाविक तेहेरानमध्ये अडकले आहेत. आम्हाला तातडीने मायदेशी आणा, असे आवाहन या भाविकांनी भारत सरकारला केले आहे. कोल्हापूरमधल्या साद टूर्स कंपनीने ही सहल आयोजित केली होती.