सिंधुदुर्ग -राज्य शासनाने 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' अंतर्गत करोडोची गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर केले. यात कोकणात 77 टक्के गुंतवणूक होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोकणात होणाऱ्या या 77 टक्के गुंतवणुकीत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात एका रुपयाचीही गुंतवणूक आली नाही, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच चिपी विमानतळाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या या जिल्ह्यातील स्थानिक युवकांनाच मिळाल्या पाहिजेत. बाहेरच्यांना येथे नोकऱ्या करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. कणकवलीतील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
सत्ताधारी जनतेची दिशाभूल करतात -
कोकणातील ठाणे, पालघर रायगड या जिल्ह्यात गुंतवणूक आली आहे. परंतु सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात एका रुपयाचीही गुंतवणूक आली नाही. आमचा सिंधुदुर्ग जिल्हा दरडोई उत्पन्नात राज्यात पाचव्या नंबरवर होता, त्याचे काय होणार ही चिंता आम्हाला आहे. सिंधुदुर्गातील सत्ताधारी जनतेची दिशाभूल करून जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
बेरोजगार तरुणांना नोकऱ्या कुठून देणार -