महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदीमुळे साताऱ्यात भाजीपाला अन् फळांचे दर वाढले

भाजीपाला, फळे ही जीवनावश्यक आहेत. मात्र, आता संचारबंदी लागू झाल्यामुळे नागरिक भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. आता यामध्ये व्यापारी वर्ग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक मंडईत भाजीपाला विकावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाला आणि फळांचे दर वाढलेले दिसून येत आहेत.

By

Published : Mar 25, 2020, 10:02 AM IST

Updated : Mar 25, 2020, 11:20 AM IST

संचारबंदीमुळे साताऱ्यात भाजीपाला अन् फळांचा दर दुप्पट
संचारबंदीमुळे साताऱ्यात भाजीपाला अन् फळांचा दर दुप्पट

सातारा - जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही पूर्ण शेती व शेती पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, कोरोना विषाणूमुळे सरकारने केलेली संचारबंदी. यामुळे भाजीपाला व फळे यांचे दर वाढलेले आहेत. तसेच अनेक शेतकरी वर्गाचा माल मार्केट बंद असल्याने स्थानिक ठिकाणी विकावा लागत आहे. याचा परिणाम जनजीवनावर झालेला पाहायला मिळत आहे.

संचारबंदीमुळे साताऱ्यात भाजीपाला अन् फळांचे दर वाढले

भाजीपाला, फळे ही जीवनावश्यक आहेत. मात्र, आता संचारबंदी लागू झाल्यामुळे नागरिक भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. आता यामध्ये व्यापारी वर्ग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक मंडईत भाजीपाला विकावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाला आणि फळांचे दर वाढलेले दिसून येत आहेत. यामुळे शेतकरी हतबल न होता या संकटाला तोंड देऊ, असे सांगताना दिसत आहेत. याचा आढावा घेतला, आमचे प्रतिनिधी महेश जाधव यांनी...

Last Updated : Mar 25, 2020, 11:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details