महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बैलगाडी शर्यतीचे गुपचुप आयोजन; उच्चभ्रू लोकांची उपस्थिती अन् अचानक पडली धाड, पुढे काय झालं वाचा

उंबर्डे परिसरात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी बैलगाडीसह शर्यत पाहण्यासाठी आलेल्या उच्चभ्रू लोकांच्या अलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. शिवाय या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

By

Published : Sep 15, 2020, 7:01 AM IST

Updated : Sep 15, 2020, 7:51 AM IST

Vaduj police action on organizing bullock cart race in satara district
बैलगाडी शर्यतीचे चोरी छुपे आयोजन; उच्चभ्रू लोकांची उपस्थिती अन् अचानक पडली धाड, पुढे काय झालं वाचा

कराड (सातारा) - खटाव तालुक्यातील उंबर्डे परिसरात बैलगाडी शर्यत आयोजित करणार्‍यांवर वडूज पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी शर्यतीच्या बैलगाड्यांसह शर्यतीसाठी आलेल्या लोकांच्या आलिशान गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. याशिवाय पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी आहे. तरीही बैलगाड्या शर्यतीच्या शौकिनांकडून मोठी बक्षिसे जाहीर करून बैलगाड्यांच्या शर्यतीचे ग्रामीण भागात आयोजन केले जात आहे. कोरोनामुळे यंदा यात्रा-जत्रा रद्द झाल्या. करमणुकीसह कुस्ती फड, बैलगाड्यांच्या शर्यतीही रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे शर्यत शौकीन नाराज आहेत. परंतु, चोरी-छुपे बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन केले जात आहे. पोलिसांचीही त्यांच्यावर करडी नजर आहे. खटाव तालुक्यातील उंबर्डे परिसरात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळताच वडूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बैलगाडी शर्यतीच्या आयोजकांची तारांबळ उडाली.

बैलगाडी शर्यतीचे गुपचुप आयोजन...

मुंबईहून काही शर्यत शौकीनही अलिशान गाड्यांमधून आले होते. तसेच स्थानिक लोकांनी या शर्यतीचे आयोजन केल्याची कुणकुण पोलिसांना होती. याबाबत वडूज पोलिसांत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बैलगाड्या आणि शर्यतीसाठी आलेल्या शौकिनांच्या अलिशान गाड्याच्या ठाण्याच्या आवारात आणून लावल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून प्रशासन जनजागृती, काळजी घेण्याचे आवाहन करत असताना गर्दी जमवून आणि कडकडीत बंद असताना बेकायदेशीरपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे. शर्यतीचे आयोजन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि बेकायदा शर्यतीबद्दल कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राणिमित्रांकडून होत आहे.

हेही वाचा -प्रेरणादायी..! मुस्लीम बांधवांनी उभारले सुसज्ज कोविड सेंटर

हेही वाचा -चंद्रलेखाराजे भोसले पंचत्वात विलीन, माहुलीच्या राजघाटावर नातवाने दिला अग्नी

Last Updated : Sep 15, 2020, 7:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details