महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील माण-खटाव मतदारसंघात युतीत बिघाडी

सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघात युतीत बिघाडी झाली आहे. राज्यात भाजप आणि सेना एकत्र लढत असताना माण-खटाव मतदारसंघात मात्र, भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकांच्या विरोधात शड्डु ठोकला आहे.

By

Published : Oct 2, 2019, 5:22 PM IST

माण-खटाव

सातारा- राज्यात भाजप आणि शिवसेनेत युती झाली आहे. मात्र, या युतीमुळे काही ठिकाणी शिवसेनेच्या हक्काच्या मतदारसंघांतील उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे बंडखोरीचे प्रमाण वाढणार आहे. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघातही युतीत बिघाडी झाली आहे.


एकीकडे राज्यात भाजप आणि सेना एकत्र लढत असताना माण-खटाव मतदारसंघात मात्र, भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकांच्या विरोधात शड्डु ठोकला आहे. वास्तविक बघता हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मदतीने माजी आमदार जयकुमार गोरे यांनी हा मतदारसंघ भाजपकडे खेचुन घेतला. त्यामुळे शिवसेना नेते शेखर गोरे चांगलेच संतप्त झाले आहेत. तर भाजपचे माजी आमदार दिलीपराव यळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी देखील वेगळी चूल मांडली आहे. अचानकपणे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार जयकुमार गोरे यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.


शेखर गोरे हे ४ ऑक्टोबरला निवडणूक अर्ज भरणार आहेत. मात्र, शेखर गोरेंनी त्यांच्या जाहिरातीवर शिवसेनेचे चिन्ह वापरत खळबळ उडवून दिली आहे. या निर्माण झालेल्या पेचात दोन्हीपक्ष कसा मार्ग काढणार हे बघावे लागणार आहे.

कोण आहेत शेखर गोरे-
1) माजी आमदार जयकुमार गोरे यांचे छोटे बंधू
2) 2014 मध्ये माण-खटाव विधानसभा मतदारसंघात 52000 मते घेतली आहेत.
3) राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2016ला सांगली- सातारा विधानपरिषद लढवली होती.
4) म्हसवड नगरपालिकेवरही सत्ता
5) बाजार समिती माण, खरेदी विक्री सांघात बरोबरीत सत्ता सोडवली आहे.
6) फलटण येथील शरद पवार यांच्या सभेत राडा प्रकरणी राज्यभर चर्चित

ABOUT THE AUTHOR

...view details