महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली येथे महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱयांनी आंदोलन केले. सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी - नागपूर विजापूर-गुहागर दोन महामार्गांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत.परंतू जमिनीचा योग्य मोबदला दिला जात नाही. त्यामुळे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.

By

Published : Jun 11, 2019, 6:00 PM IST

शेतकऱयांनी शासनाविरोधात घोषणा देत निषेध नोंदविला

सांगली- जिल्ह्यात रत्नागिरी - नागपूर व विजापूर - गुहागर या दोन महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. या महामार्गामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. परंतु, अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला जात नाही. त्याच्या निषेधार्थ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

शेतकऱयांनी शासनाविरोधात घोषणा देत निषेध नोंदविला
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी - नागपूर विजापूर-गुहागर दोन महामार्गांचे काम सुरू आहे. या महामार्गामुळे जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला किंवा अन्य प्रश्नांकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. तसेच जबरदस्तीने या महामार्गाचे काम सुरू असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.सरकारने रत्नागिरी-नागपूर आणि विजापूर-गुहागर महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गंभीरपणे लक्ष द्यावे. तसेच शेतकऱयांच्या समस्या आणि अडचणी तातडीने सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास पुढील काळात अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details