महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 20, 2020, 12:53 PM IST

ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण; चांगले काम न करणाऱ्यांवर कारवाई होणार - अनिल परब

वादात सापडलेल्या मुंबईच्या नाईट लाईफ बाबत बोलताना परब म्हणले, की कुठलीही गोष्ट चर्चेशिवाय होत नाही. गृहमंत्र्यांनी फक्त या बाबत म्हटले आहे. मात्र, या विषयी चर्चा झालेली नाही. ती चर्चा होईल. नाईट लाईफ स्टाईलच्या प्रस्तावाला विरोधकांचा विरोध राजकीय आहे. नाईट लाईफची संकल्पना समजून घेतली पाहिजे. नाईट लाईफ म्हणजे अय्याशी किंवा व्यभिचारी कृत्य नाही, असे परब यांनी म्हटले आहे.

ratnagiri
अनिल परब

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामावरून पालकमंत्री अनिल परब यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या ठेकेदाराचे काम बरोबर नाही किंवा ज्याने बिलकूल काम केलेले नाही अशांवर सक्त कारवाई करणार. असे ठेकेदार बदलता येतात का त्याची चाचपणी होईल, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री झाल्यानंतर अनिल परब पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. चांगले काम करणाऱ्यांना काम दिले जावे ही आमची भूमिका असल्याचे परब यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ५ वर्षापूर्वी शिवसेनेकडून महाआघाडीचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट केला आहे. या विधानानंतर शिवसेनेने या प्रकरणी सावध प्रतिक्रिया नोंदवली आहे. या संदर्भातील प्रस्तावाची माहिती मला नाही, अशी चर्चा झाली याची माहिती आम्हाला नाही, असे सांगत परब यांनी चव्हाणांचा दावा अप्रत्यक्षपणे फेटाळून लावला आहे.

वादात सापडलेल्या मुंबईच्या नाईट लाईफ बाबत बोलताना परब म्हणले की, कुठलीही गोष्ट चर्चेशिवाय होत नाही. गृहमंत्र्यांनी फक्त याबाबत म्हटले आहे. मात्र. या विषयी चर्चा झालेली नाही. ती चर्चा होईल. नाईट लाईफ स्टाईलच्या प्रस्तावाला विरोधकांचा विरोध राजकीय आहे. नाईट लाईफची संकल्पना समजून घेतली पाहिजे. नाईट लाईफ म्हणजे अय्याशी किंवा व्यभिचारी कृत्य नाही, असे परब यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-मुंबई मॅरेथॉन २०२० : इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व, जाणून घ्या विजेते...

ABOUT THE AUTHOR

...view details