महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजापूरमध्ये पूरस्थिती कायम; अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद

अर्जुना नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पाचल तळवडे रस्त्यावरील पुलावरदेखील पाणी आले आहे. दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आलेली असून पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत.

By

Published : Aug 6, 2019, 2:41 PM IST

रत्नागिरी

रत्नागिरी- राजापूरमधील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आल्याने राजापूर बाजारपेठेत पुराचा वेढा कायम आहे. शिवाजी चौकात सात फुट पाणी आहे. सोमवारी शिवाजी पथ मार्केट, वरची पेठ भागात पुराचे पाणी भरले होते. आजही हीच स्थिती कायम आहे. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे पाणी वाढतच आहे.

राजापूरमध्ये पूरस्थिती कायम

दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आल्याने मुंबई गोवा महामार्गावरची वाहतुक ठप्प आहे.

अर्जुना नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पाचल तळवडे रस्त्यावरील पुलावरदेखील पाणी आले आहे. दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आलेली असून पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details