महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडात केंद्रीय मंत्र्यांना हरवण्याची परंपरा कायम; बॅ. ए. आर. अंतुलेनंतर गीतेंचाही पराभव

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पराभव केला. या पराभवाबरोबरच केंद्रीय मंत्र्यांना हरवण्याची परंपरा कायम राखली.

By

Published : May 25, 2019, 2:15 PM IST

सुनील तटकरे

रायगड- विद्यमान केंद्रीय मंत्री असताना लोकसभेची निवडणूक हरण्याची परंपरा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कायम राहिली आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पराभव करून ही परंपरा कायम राखली आहे.

विजयाचा जल्लोष


रायगड लोकसभा मतदार संघ हा नेहमी निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेला असून येथील निकाल हे दरवेळी अनपेक्षित असेच लागलेले आहेत. कुलाबा लोकसभा मतदार संघाचे खासदार व केंद्रीय मंत्री बॅ. ए. आर. अंतुले याना 1999 मध्ये शेकापचे रामशेठ ठाकूर तर 2009 मध्ये शिवसेनेचे अनंत गिते यांनी पराभूत केले होते. त्यामुळे विद्यमान केंद्रीय मंत्री म्हणून निवडणूक लढविणाऱ्या अनंत गीते यांना सुनील तटकरेंनी पराभूत करून मंत्री पदावर असताना पराभूत करण्याची परंपरा कायम राखली आहे. मात्र ही परंपरा कायम राखण्यात सुनील तटकरे यशस्वी झाले आहेत.


कुलाबा लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे नेते बॅ. ए. आर. अंतले हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 1996 मध्ये बॅ. ए. आर. अंतुले हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री झाले. त्यानंतर झालेल्या 1998 व 1999 च्या लोकसभा निवडणुकीत शेकापच्या रामशेठ ठाकूर यांनी त्यांना पराभूत केले. त्यानंतर 2004 साली कुलाबा जिल्ह्याचे नामांतर होऊन रायगड जिल्हा हे नाव झाले. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बॅ. ए. आर. अंतुले हे खासदार म्हणून निवडून आले.


लोकसभा निवडणुकीत बॅ. ए. आर. अंतुले निवडून आल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत बॅ. ए. आर. अंतुले यांनी केंद्रीय मंत्री असताना निवडणूक लढवली. यावेळी शिवसेनेच्या अनंत गीते यांनी त्यांचा पराभव केला. बॅ. ए. आर. अंतुले केंद्रीय मंत्री असतानाही त्यांना दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले.


2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री अनंत गीते व सुनील तटकरे यांच्यात खरी लढत होती. केंद्रीय मंत्री म्हणून दोन वेळा निवडणूक लढविताना अंतुले यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे हीच परंपरा यावेळीही राखली जाऊन तटकरे जिंकणार की गीते ही परंपरा मोडणार अशी चर्चा जिल्ह्यात रंगली होती. मात्र सुनील तटकरे यांच्या विजयाने चर्चेला पूर्णविराम भेटला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details