पुणे- संत ज्ञानेश्वर माऊलींच्या शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या आषाढी वारीचा सोहळा साजरा होत आहे. माऊलींच्या पालखीचे मुख्य दिंडी मालक, देवस्थान विश्वस्त व शितोळे सरकार, शिंदे सरकार यांच्यासह 50 जणांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान करण्यात आले. हरिनामाचा जयघोष करत विना-टाळ-मृदुंगाच्या गजरात आज पाच वाजता माउलींच्या पालखीचे प्रस्थान करण्यात आले. प्रस्थानानंतर मंदिराच्या बाजुला असणाऱ्या देऊळवाड्यात 14 दिवस पालखीचे वास्तव्य राहणार आहे. त्यानंतर हेलिकॉप्टर किंवा बसने माऊलींच्या पादुका पंढरीला नेण्यात येणार आहेत.
कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा पायीवारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र, सर्व प्रथा परंपरांचे पालन करून सोशल डिस्टंन्सच्या नियमांचे पालन करत वारकर्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याच्या पालखीचे प्रस्थान करण्यात आले आहे.