महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याचा दावा खोटा - निवृत्त नौदल अधिकारी

निवृत्त नौदल अधिकारी रवींद्र पाठक यांनी म्हटले आहे. की, पाकिस्तान खरे बोलत आहे, असे वाटत नाही कारण ते प्रत्येक वेळी खोटे बोलत आले आहेत.

By

Published : Feb 27, 2019, 3:56 PM IST

Pune

पुणे- पाकिस्तानच्या हवाई दलाकडून भारताचे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला जात आहे. यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. याबद्दल निवृत्त नौदल अधिकारी रवींद्र पाठक यांनी म्हटले आहे. की, पाकिस्तान खरे बोलत आहे, असे वाटत नाही कारण ते प्रत्येक वेळी खोटे बोलत आले आहेत.

पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याचा दावा खोटा

पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याचा दावा खोटा

पाकिस्तान दावा करत आहेत की, एका पायलटला पकडले आहे, मात्र, जोपर्यंत पुरावे देत नाहीत, तोपर्यंत त्यामध्ये काही तथ्य वाटत नाही. या क्षणी पाकिस्तानने केलेल्या दाव्याला काही तथ्य नाही. पाकिस्तानने आतापर्यंत एकही शब्द खरा बोललेला नाही त्यामुळे त्यांच्यावर विश्वास नाही, असेही पाठक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भारताच्या संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे. पाकिस्तानच्या दाव्यात तथ्य नसल्याचे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी पीटीआयला सांगितले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details