महाराष्ट्र

maharashtra

रिक्षा बंदला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा विरोध; सहभागी न होण्याचा निर्णय

By

Published : Sep 28, 2020, 5:18 PM IST

रिक्षा पंचायत बंद पुकारत आहे. ही शोकांतिका आहे. रिक्षा पंचायत घेत असलेल्या अशा निर्णयांमुळे रिक्षा चालकांचे अनेक वर्षांपासून नुकसान झालेले आहे. या बंदला आमचा पाठिंबा नाही. त्यात कोणताही रिक्षाचालक सहभागी होणार नाही. तसेच, रिक्षा चालकाने सहभागी होऊ नये, असे आवाहन कांबळे यांनी केले.

रिक्षा बंदला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा विरोध
रिक्षा बंदला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा विरोध

पुणे- रिक्षा पंचायत पुणेतर्फे १ ऑक्टोबरला पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे. याला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने विरोध दर्शवला असून यात रिक्षा चालकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे.

माहिती देताना महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे

रिक्षा बंदला महाराष्ट्र रिक्षा पंचायतने पाठिंबा न देता रिक्षा चालक आणि मालक यात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. येत्या ३० सप्टेंबरला संपूर्ण राज्यात महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे, असे कांबळे म्हणाले. त्याचबरोबर, रिक्षा पंचायतने पुकारलेला बंद हा अत्यंत चुकीचा आहे. सध्या रिक्षा व्यवसायच बंद आहे. त्यात तुम्ही बंद पुकारत आहात. एकीकडे अवघा महाराष्ट्र अनलॉककडे जात आहे. मात्र, रिक्षा पंचायत बंद पुकारत आहे. ही शोकांतिका आहे. रिक्षा पंचायत घेत असलेल्या अशा निर्णयांमुळे रिक्षा चालकांचे अनेक वर्षांपासून नुकसान झालेले आहे. या बंदला आमचा पाठिंबा नाही. त्यात कोणताही रिक्षा चालक सहभागी होणार नाही. तसेच, रिक्षा चालकाने सहभागी होऊ नये, असे आवाहन कांबळे यांनी केले.

तसेच, ३० सप्टेंबरला सरकार विरोधात प्रत्येक रिक्षा स्टँड आणि चौकात बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत. लॉकडाऊन पासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. राज्य सरकारने रिक्षा चालकांना आर्थिक मदत केलेली नाही. त्यामुळे, रिक्षा चालक आर्थिक अडचणीत सापडला आहे. अनेकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. त्यामुळे, रिक्षा चालक मालक यांना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे, अशी मागणी कांबळे यांनी केली. आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक येथे रिक्षा चालकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. मग राज्य सरकार का देत नाही. किती रिक्षाचालकांची आत्महत्या होण्याची वाट पाहणार आहात, असा सवाल कांबळे यांनी सरकारला केला.

हेही वाचा-राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने

ABOUT THE AUTHOR

...view details