पुणे - दिवाळीचा सण म्हटलं की सर्वांसाठी एक आनंदाचे पर्व वर्षानुवर्ष अखंडपणे ही दिवाळी साजरा करण्याची परंपरा आहे. दिवाळीत सर्वांच्याच घरी फराळ केला जातो. त्याच पद्धतीने मिठाई आणि इतरही पदार्थ हे बाजारातून खरेदी केली जाते. फराळ किंवा मिठाई खाताना ती मिठाई किंवा फराळ जास्त खाल्यास त्याचा धोका हा आरोग्यास होऊ शकतो आणि त्यामुळे तब्यात बिघडूदेखील शकते. म्हणून दिवाळीत फराळ खाताना आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्याच बरोबर व्यायाम देखील करणं तितकच गरजेचं आहे, असा सल्ला आएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत ईटीव्ही भारतने डॉ. भोंडवे यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते ईटीव्ही भारतसोबत बोलत होते.
तर वजन वाढू शकते...
कोरोनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याचे महत्त्व किती आहे हे कळलेलेच असताना दिव्यांच्या या महोत्सवात फराळ आणि मिठाई हा एक महत्त्वाचा भाग असतो. दिवाळीच्या सणा दरम्यान आपले संकोच बाजूला ठेवून लाडू, रसगुल्ला, काजुकतली, जिलेबी आणि इतर गोष्टींवर आपण ताव मारत असतो. मात्र, या पदार्थांवर ताव मारत असताना या उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात वजन वाढण्याची शक्यता असते. त्याच पद्धतीने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवून डायबेटीसच्या समस्या फॅटफूल पदार्थांमुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी वाढणे अशा आजारांचा सामना करावा लागतो. दिवाळीच्या काळात लोकांच्या शरीरातील साखरेच्या पातळीत वाढ होते. सण उत्सवांच्या काळात 250 मिलीग्राम डीएलवरील लोकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढ होते. 300 मिलीग्राम डीएलच्यावर लोकांमध्ये 18 टक्के वाढ होते. त्यामुळे दिवाळीत फराळ खात असताना वजन वाढणार नाही, ना याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असे यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.