महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 16, 2019, 6:22 PM IST

ETV Bharat / state

एमबीए प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ सुटेना; 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

कधी तांत्रिक अडचणी, कधी प्रवेश प्रक्रियेची पद्धत बदलणे, तर कधी न्यायालयात याचिका अशा अडथळ्यांत एमबीएची प्रवेश प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे राज्यातील 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

एमबीए प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ सुटेना; 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

पुणे - देशातील पदव्युत्तर व्यवस्थापनाची अर्थात एमबीए अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र, राज्यातील महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. कधी तांत्रिक अडचणी, कधी प्रवेश प्रक्रियेची पद्धत बदलणे, तर कधी न्यायालयात याचिका अशा अडथळ्यांत एमबीएची प्रवेश प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

एमबीए प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ सुटेना; 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
'डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एजुकेशन'चे (डीटीई) मुख्य भेटायला तयार नाहीत. उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना विद्यार्थ्यांनी 30 हजार ट्विट केले. परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. प्रवेशाचे प्रकरण कोर्टात असल्याने 'तारीख पे तारीख'मुळे विद्यार्थी वैतागले आहेत. इतर राज्यांतील आयआयएम तसेच इतर महाविद्यालये सुरू झाली आहेत. आम्ही मात्र अजुनही बाहेरच फिरत आहोत. आमचे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार, असा प्रश्न एमबीए करू इच्छिणारे विद्यार्थी सरकारला विचारत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details