पालघर - जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रिया आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू होती. सायंकाळच्या दरम्यान वसई येथील शिक्षिका नीता अजय म्हात्रे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
बाईट 1.अजय म्हात्रे (शिक्षिका नीताचे पती) 2. मिलिंद बोरीकर- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या बदली प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय झाल्याचा आरोप केला जात आहे. आज बदली प्रक्रियेत त्या सकाळपासून सामील होत्या. अर्धा तास उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नव्हती. दरम्यान, या शिक्षकांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आम्हाला कळले असल्याचे मिलिंद बोरीकर यांनी सांगितले. त्यांना लागणारे सर्व ती वैद्यकीय मदत देण्यासाठी आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. प्रशासनामार्फत प्रतिनिधीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लवकरच पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.