महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 27, 2022, 8:22 AM IST

Updated : May 27, 2022, 8:40 AM IST

ETV Bharat / state

पालघर औरंगाबाद बसचा वाघोबा घाटामध्ये अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी

वाघोबा घाटात पालघर औरंगाबाद बसचा अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला आहे. चालकाने मद्यपान केले असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान या अपघातामध्ये 12 ते 15 प्रवासी जखमी झालेत. सर्व जखमींना पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पालघर औरंगाबाद बसचा वाघोबा घाटामध्ये अपघात
पालघर औरंगाबाद बसचा वाघोबा घाटामध्ये अपघात

पालघर -पालघर औरंगाबाद बसचा वाघोबा घाटात अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला आहे. चालकाने मद्यपान केले असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान या अपघातामध्ये 12 ते 15 प्रवासी जखमी झालेत. सर्व जखमींना पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

व्हिडीओ
रातराणी बस सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या बसचा चालक नाशिक येथे बदलण्यात आला असल्याचे समजते. सकाळी सहाच्या सुमारास वाघोबा दरीमध्ये सदर बस उलटली. प्रवाशांकडून वारंवार कंडक्टरला सांगण्यात येत होते की चालक मद्यधुंद अवस्थेत आहे. सदर चालकास बस चालवू देऊ नये तरी कंडक्टरने आमचं ऐकले नसल्याचे प्रवाशांनकडून सांगण्यात आले. चालक मात्र भरधाव वेगात गाडी चालवत होता. त्यामुळेच हा अपघात झाला, असा दावा या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांनी केला आहे.
Last Updated : May 27, 2022, 8:40 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details