महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूरग्रस्त नागरिकांसाठी पालघर‍ जिल्ह्यातून मदत रवाना ; जिल्ह्यातील आपादग्रस्त भागांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहाणी

मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे  सांगली, कोल्हापूर आणि परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. या पूरग्रस्तांना तातडीने आवश्यक असणाऱ्या वस्तुंची मदत करण्याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी आवाहन केले होते. त्यानुसार, पालघर जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

By

Published : Aug 11, 2019, 2:11 AM IST

जिल्ह्यातील आपदग्रस्त भागांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

पालघर(वाडा)- अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील आपादग्रस्त भागांची पाहाणी केली. तसेच, सांगली, कोल्हापूर आणि इतर पूरग्रस्त भागातून स्थालांतरीत केलेल्या लोकांना मदत पाठविणे व त्यांना अत्यावश्यक साधनांची पुर्तता करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले होते. त्यानुसार वाडा तालुक्यातून मदत रवाना झाली.

जिल्ह्यातील आपदग्रस्त भागांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर आणि परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. या पूरग्रस्तांना तातडीने आवश्यक असणाऱ्या वस्तुंची मदत करण्याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी आवाहन केले होते. त्यानुसार, पालघर जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शनिवारी वाडा तालुक्यातून मदत रवाना झाली. जिल्ह्यातील नागरिकांना मदत करता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालघर, वसई आणि वाडा येथे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.

तहसील कार्यालय वाडा मार्फत आज चिक्की, फरसाण, सोया स्नॅक्स, मून स्नॅक्स (राईस फ्लेक्स), डायट चिवडा अशा खाद्य पदार्थांचे ५० बॉक्स, पारले जी बिस्किटचे १० बॉक्स, मिनरल वॉटरचे ५० बॉक्स (५०० बॉटल्स) अशी मदत पाठविण्यात आली. कोका कोला कंपनीच्या वतीने ७००० लिटर पाण्याचा एक स्वतंत्र ट्रक पाठविण्यात आला आहे. छेडा फूड प्रॉडक्ट, कोका कोला, पारलेजी कंपनी, ब्रिजील मिनरल वॉटर या कंपन्यांमार्फत मदतीमध्ये सहभाग नोंदवण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्ह्यातील आपदग्रस्त भागांची पाहणी

पालघर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी आज विक्रमगड तालुक्यातील मलवाडा गावास भेट दिली. यावेळी त्यांनी मलवाडा येथील वाडा विक्रमगड रस्त्यास जोडणाऱ्या पुलाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. नागरिक आणि विद्यार्थ्यांना पायी जाण्यासाठी सदर पूल दोन दिवसांमध्ये खुला करण्याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश दिले.

मलवाडा-वसुली-पाली मार्गे एसटी बस सुरू करण्याबाबत, तसेच परिसरातील आरोग्याच्या प्रश्नी चौकशी करून उपयुक्त औषधसाठा आणि अत्यावश्यक बाबींची पूर्तता करण्याबाबतही त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी (वाडा), तहसीलदार (विक्रमगड), सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार चे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी वाडा तालुक्यातील सर्व यंत्रणांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये केलेल्या कामाचा घेतला आढावा

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वाडा तालुक्यातील सर्व यंत्रणांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये केलेल्या कामांबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना पंचनामे पूर्ण करण्याबाबत व पंचनाम्यानुसार लाभार्थ्यांना तात्काळ मदत करण्याबाबतचे निर्देश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते.

त्याचबरोबर डॉ.शिंदे यांनी आज वाडा-देवगाव-नाशिक रस्त्यावरील मोखाडा तालुक्यातील आमले या गावाला भेट दिली. मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या दरडीची पाहणी करून रस्ता खुला झाल्याबाबतची त्यांनी खात्री केली. उपस्थित यंत्रणांना त्यांनी पुढील कामाबाबतचे निर्देशही दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details