महाराष्ट्र

maharashtra

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना होणारच - जलसंधारणमंत्री तानाजी सावंत

By

Published : Jul 20, 2019, 9:56 AM IST

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना ही रखडणार नसून ती पूर्ण होणारच असा विश्वास जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक केला. ही योजना रखडणार असल्याची चुकीची अफवा पसरवल्याचे सावंत म्हणाले.

जलसंधारणमंत्री तानाजी सावंत

उस्मानाबाद - कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना ही रखडणार नसून, ती पूर्ण होणारच असा विश्वास जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक केला. ही योजना रखडणार असल्याची चुकीची अफवा पसरवल्याचे सावंत म्हणाले. मंत्री झाल्यानंतर प्रथमच सावंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मुगगाव या गावाला भेट दिली.

आमदार सावंत यांनी भूम, वाशी, परंडा या ३ तालुक्यांसाठी 800 नवीन बंधाऱ्यांना मंजुरी दिली. ५ वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त करणार असून, वेळप्रसंगी स्वखर्चाने हा मतदारसंघ दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना होणारच - जलसंधारणमंत्री तानाजी सावंत

कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना ही रखडणार नसून, ही चुकीची अफवा पसरवली गेली आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना ही होणारच असल्याचे त्यांनी सांगितले. या गावकऱ्यांच्या भेटीनंतर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा परंडा येथे घेण्यात आला. याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील हे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details