महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हैसमाळ गावातील महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट

गुजरात सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ गावातील लोकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करत फिरावे लागत आहे.

By

Published : May 7, 2019, 11:21 PM IST

म्हैसमाळ गावातील महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट

नाशिक- राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या दुष्काळाचा फटका अनेक गावांना बसला आहे. गुजरात सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ गावातील लोकांनाही हंडाभर पाण्यासाठी पायपीट करत फिरावे लागत आहे.

म्हैसमाळ गावातील महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट

म्हैसमाळ गावची लोकसंख्या जवळपास १ हजारच्या आसपास आहे. या गावात सध्या पाण्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या ठिकाणी पिण्यासाठी घोटभर पाणीही लवकर मिळत नाही. या गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. ज्या ठिकाणी पाण्याचा पाझर आहे, तेथील वाट अतिशय अवघड असून तिथे प्राण्यांची भीती आहे. मात्र, पाणी महत्त्वाचे आहे त्यामुळे मोठ्या हिम्मत करुन या ठिकाणाहून पाणी आणावे लागत, असल्याचे येथील महिला सांगतात. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दीड ते २ तास येथे बसून राहावे लागते. त्यानंतर हंडाभर पाणी मिळते तेही दुषित.

दरवर्षी लाखो रुपयांचा निधी आदिवासींच्या नावाखाली खर्च केला जातो. मात्र, त्यांच्या मूलभूत समस्या काही सोडवल्या जात नाहीत. निवडणुका आल्या की अनेक राजकीय पक्ष लोक या गावांला भेटी देतात, आश्वासन देतात. मात्र, मत घेऊन झाली की कोणीही यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मायबाप सरकारने आता तरी आदिवासी भागाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details