हरसूल (नाशिक) - अलीकडे आलिशान शाही लग्नाची नवी परंपरा सुरु होत असताना पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून वऱ्हाड नेण्यात ( groom reached in bullock cart in nashik ) आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ एक दोन नाही तर तब्बल 10 बैलगाड्यांतून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील हरसूल येथून निघालेले हे वऱ्हाड 12 किमीवरील शिरसगावला पाच तासांत लग्न कार्यालयात पोहोचले.
10 बैलगाड्यांमधून लग्नाचं वऱ्हाड -हरसूल येथील शेतकऱ्याने आपल्या विवाहाचे मुलाच्या वऱ्हाड आलिशान गाड्यांऐवजी पारंपरिक पद्धतीने आदिवासी सजविलेल्या 10 बैलगाड्यांमधून नवरीच्या गाव शिरसगाव येथे वाजत गाजत नवरदेवाने बैलगाडी स्वतः हाकत वऱ्हाडी मंडळींना लग्नाच्या ठिकाणी पोहचवले. हरसूल येथील पुंडलिक कनोजे यांचे चिरंजीव पद्माकर व शिरसगाव येथील मोहन साबळे यांची कन्या विजया यांचा शुभविवाह दि. 27 एप्रिल रोजी होता.