महाराष्ट्र

maharashtra

गोकुळाष्टमीचे औचित्य : नाशकात साकारल्या श्रीकृष्णाच्या बालछटा; ७२ तासांची मेहनतीनंतर तयार झाली रांगोळी

By

Published : Aug 30, 2021, 5:27 PM IST

Updated : Aug 30, 2021, 6:41 PM IST

गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून मालेगाव येथे साई आर्ट संस्थेचे प्रमोद आर्वी व त्याच्या  सहकलाकारांनी आज 'श्रीकृष्णाच्या बालछटा' असलेली अप्रतिम अशी रांगोळी साकारली आहे. १०×१५ फूट आकाराची ही रांगोळी साकारण्यासाठी या कलाकारांना तब्बल ७२ तास दिवस रात्र मेहनत घ्यावी लागली आहे.

after 72 hours hardwork rangoli made in nashik over gokulashtami occassion
नाशकात साकारल्या श्रीकृष्णाच्या बालछटा

नाशिक - जिल्ह्यातील मालेगाव येथे गोकुळाष्टमीनिमित्त मालेगावच्या कलाकारांनी एकत्र येत श्रीकृष्ण जन्माचा देखावा असलेली अतिशय सुंदर रांगोळी काढली आहे. तब्बल ७२ तासाच्या परिश्रमानंतर ही रांगोळी साकारण्यात आली.

साई आर्ट संस्थाचालक प्रमोद आर्वी याबाबत बोलताना

१०×१५ फूट आकाराची रांगोळी, पिगमेंट, लेक रंगांचा वापर -

गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून मालेगाव येथे साई आर्ट संस्थेचे प्रमोद आर्वी व त्याच्या सहकलाकारांनी आज 'श्रीकृष्णाच्या बालछटा' असलेली अप्रतिम अशी रांगोळी साकारली आहे. १०×१५ फूट आकाराची ही रांगोळी साकारण्यासाठी या कलाकारांना तब्बल ७२ तास दिवस रात्र मेहनत घ्यावी लागली आहे. या रांगोळीत विशेष म्हणजे यात पिगमेंट व लेक रंगांचे मिश्रण करण्यात आले असून हे रंग सांगली, पुणे, मुंबई याठिकाणी मिळत असतात.

२७ किलो रांगोळीचा यात वापर करण्यात आला आहे. सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी आदी सर्वच कार्यक्रमांच्या निमित्ताने मालेगावचे हे कलाकार विशेष अशी रांगोळी साकारत त्या माध्यमातून महापुरुष व त्यांच्या कार्यांना उजाळा देत असतात. मालेगावमध्ये अशाप्रकारे रांगोळी साकारल्याने साई आर्ट संस्थेच्या सर्व कलाकार व शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Last Updated : Aug 30, 2021, 6:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details