महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करताना पालिका कर्मचाऱ्याला मारहाण

पालिका कर्मचारी कर्तव्य बजावत असताना मारहाण केल्याप्रकरणी कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर आहे.

By

Published : Jun 15, 2019, 10:37 PM IST

नंदुरबार

नंदुरबार- नवापूर शहरात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने नगर पालिका प्रशासन अग्नीशमन दलाच्या बंबाने टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवत आहे. दरम्यान, पाणी पुरवठा केला जात असताना पालिका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

नंदुरबार

नवापूर पालिकेचे नगरसेवक हारूण खाटीक यांचा फोन आल्याने अग्नीशमन दलाचा बंब नारायणपूर रस्त्यावर पाणी वाटप करण्यासाठी पाठवण्यात आला. टंचाईग्रस्त भागात अग्नीशमन दलाचे चालक राजेश गावित व फायरमेन भास्कर भालेराव हे दोन कर्मचारी गेले. तेथील २० ते २५ महिलांना पाणी वाटप करत असताना नगरसेवक हारूण खाटीक यांचा भाऊ रफिक पैलवानसोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने पालिकेच्या कर्मचाऱ्यांना, पाणी भरत असलेल्या महिलांना बाजूला करत आमच्या घरी पाणी भरण्यासाठी अग्नीशमन बंबाची गाडी घ्यावी, असा आग्रह केला. फायरमेन भास्कर एकनाथ भालेराव यांनी त्याला विरोध केला, बंब एकासाठी नसून सर्वांसाठी आहे. आधी महिलांना पाणी भरू द्यावे नंतर गाडी आणतो. परंतु, फायरमेनचे न ऐकता दादागिरी करत शिवीगाळ करून त्यांच्या कानशीलात लगावली.

पालिका कर्मचारी कर्तव्य बजावत असताना मारहाण केल्याप्रकरणी कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी हा प्रकार वरिष्ठांचा कानावर घालून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ABOUT THE AUTHOR

...view details