महाराष्ट्र

maharashtra

विशेष : शेतकऱ्याने कल्पकतेने बनवला सेंद्रिय ब्रँड; परराज्यातून होतेय मालाची मागणी.. !

मालेगाव (ता. अर्धापूर) येथील युवा शेतकरी भगवान इंगोले यांनी सेंद्रिय शेतीचे स्वतः उत्पादन घेत त्या शेतमालाचे उत्पादन, प्रक्रिया व विपणन या त्रिसूत्रीचा वापर केला असून या शेतीमालाला परराज्यातही मोठी मागणी होत आहे.

By

Published : Nov 30, 2020, 10:15 PM IST

Published : Nov 30, 2020, 10:15 PM IST

Updated : Nov 30, 2020, 10:25 PM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

नांदेड - शेतकरी आपल्या शेतात विविध पिकांचे उत्पादन घेतो. पण, शेतीमाल प्रक्रिया आणि विक्रीसाठी कमी पडतो. पण, मालेगाव (ता. अर्धापूर) येथील युवा शेतकरी भगवान इंगोले यांनी या सर्व बाबींवर मात करत सेंद्रिय शेतीचे स्वतः उत्पादन घेत त्या शेतमालाचे उत्पादन, प्रक्रिया व विपणन या त्रिसूत्रीचा वापर केला असून या शेतीमालाला परराज्यातही मोठी मागणी होत आहे.

बोलताना शेतकरी

रासायनिक खतांचा वापर न करता स्वतःच तयार केली सेंद्रिय व जैविक खते

अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील युवा शेतकरी भगवान इंगोले हे मागील चार वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. विशेषतः भगवान इंगोले यांनी आपल्या शेतात शेती लागवडीसाठी लागणारी खते, फवारणी स्वतः तयार करतात. यामध्ये जैविक निविष्ठाची निर्मिती व कीडनाशक औषधे बनवतात. सेंद्रिय शेतीमध्ये त्यांनी हळद, ऊस या सर्व प्रकारचे कडधान्य ते सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करतात.

शेतकरी गटाची केली स्थापना

मालेगाव येथे त्यांनी ओम शांती या शेतकरी गटाची स्थापना केली आहे . या गटात 34 शेतकरी असून 50 एकर शेतीमध्ये सेंद्रिय शेती केली जाते आहे. भगवान इंगोले यांनी शेतीमाल विक्रीसाठी इतर बाजारपेठेवर अवलंबून न राहता स्वतःच्या शेतात उत्पादित केलेल्या शेतीमालाची उत्पादन प्रक्रिया व विपणनही केली आहे.

सेंद्रिय शेतीमालाला स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज

सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली. सेंद्रिय शेती करण्यासाठी कृषी विभागाचे चांगले सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे . पण, सेंद्रिय शेतमाल विक्री करण्यासाठी स्वतंत्र बाजारपेठ नसल्याने खूप अडचणी येत आहेत. त्यामुळे केवळ प्रमाणिकृत सेंद्रिय शेतमालासाठी स्वतंत्र बाजारपेठेची उपलब्धता शासनाने करून दिल्यास ग्राहकांची फसवणूक होणार नाही. सेंद्रिय शेती करणायांना त्यांचा माल विक्री करण्यासाठी शाश्वती मिळेल. त्यामुळे सेंद्रिय शेतीमालाला स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा शेतकरी भगवान इंगोले यांनी व्यक्त केली आहे.

कृषी मंत्री व प्रशासनाकडून कौतुक

कृषीमंत्री कृषी विभागातील अनेक संशोधक जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी आदींनी सेंद्रिय शेतीची पाहणी करून कौतुक केले. मालेगाव येथे त्यांनी ओम शांती या शेतकरी गटाची स्थापना केली आहे. या गटात 34 शेतकरी असून 50 एकर शेतीमध्ये सेंद्रिय शेती केली जात आहे.

हेही वाचा -मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक, नांदेडमधील चार मतदान केंद्रांमध्ये बदल

Last Updated : Nov 30, 2020, 10:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details