महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 17, 2019, 8:15 AM IST

ETV Bharat / state

शिमगा सरला तरी कवित्व कायम अशी बंगालची स्थिती - मोहन भागवत

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले होते. तसेच जे आश्वासन पूर्ण केले नाही ते पूर्ण करण्याचा सल्लाही दिला,

मोहन भागवत

नागपूर- शिमगा सरला तरी कवित्व जात नाही, अशी परस्थिती सध्या बंगालची आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष एकमेकांच्याविरोधात असतात, मात्र निवडणुकीनंतर देखील देशात अराजकता पसरवण्याचे काम काही लोक करत आहेत. हे मानवतावादाविरोधात असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले होते. तसेच जे आश्वासन पूर्ण केले नाही ते पूर्ण करण्याचा सल्लाही दिला, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडत त्यांनी राजकीय पक्षांना इशाराही दिला.

लोक हे अतिशय शहाणे आहेत. त्यांना कोण काय करते हे कळते. जे सत्तेचा माज करतात त्यांना लोक नाकारतात हे पश्चिम बंगालमध्ये दिसून आले आहे. ७५२ ठिकाणांहून आलेल्या ८४८ विद्यार्थ्यांनी संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षेकरता सहभाग नोंदवला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details