महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 2, 2022, 12:50 PM IST

ETV Bharat / state

Orange Farmers in Tension : उन्हाच्या तडाख्यामुळे संत्रा गळती वाढली, शेतकरी चिंतातूर

नागपूरची ओळख असलेली संत्री आंबट गोड चवीसाठी आणि दर्जेदार गुणवत्ते जगप्रसिद्ध आहे. नागपूर आणि अमरावती जिल्हात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असल्याने संत्राचे उत्पादनचे धोक्यात आले आहे. नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांचे तापमान 45 डिग्रीच्यावर गेल्यामुळे संत्राच्या झाडाला वरील संत्र्याचे फळ गळून पडत आहे. सोबतच ब्लॅक फंगस ( Black Fungus ) नावाचा रोग आल्याने सुद्धा संत्र्याची गळती मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर -नागपूरची ओळख असलेली संत्री आंबट गोड चवीसाठी आणि दर्जेदार गुणवत्ते जगप्रसिद्ध आहे. नागपूर आणि अमरावती जिल्हात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असल्याने संत्राचे उत्पादनचे धोक्यात आले आहे. नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांचे तापमान 45 डिग्रीच्यावर गेल्यामुळे संत्राच्या झाडाला वरील संत्र्याचे फळ गळून पडत आहे. सोबतच ब्लॅक फंगस ( Black Fungus ) नावाचा रोग आल्याने सुद्धा संत्र्याची गळती मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

शेतकरी चिंतातूर

नागपूर जिल्ह्यातील नरखेड आणि काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी महिन्यात थंडीचे प्रमाण कमी झाल्यानंतर वातावरणात बदल होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले. मार्च आणि एप्रिल महिना तर प्रचंड तापल्यामुळे बहुतांश संत्र्याच्या झाडांवरील संत्रा हा गळून पडतो आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने सिंचनासाठी पाण्याची चांगली सोय आहे. मार्च महिन्यापासूनच तापमान 42 अंशापर्यंत गेले आहे तर एप्रिलमध्ये तापमानाचा पारा हा 45 ते 46 अंशापर्यंत पोहोचला. संत्र्याच्या बागेत सिंचन असूनही गळतीचे प्रमाण वाढतच आहे. उष्णतेचे प्रमाण पुढे ही वाढतच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

शासनाने मदत द्यावी -संत्र्यावर आलेली ही गळती जर अशीच सुरू राहिली तर यामुळे शेतकऱ्यांनाच मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील फळ उत्पादन शेतकऱ्यांना जशी मदत केली जाते. त्या पार्श्वभूमीवर संत्रा उत्पादन शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इतकी मोठी गळती कधीच बघितली नाही -नागपूर जिल्ह्यातील संत्री प्रसिद्ध असल्याने त्याची मागणी मोठी आहे. मात्र, उन्हामुळे संत्रा गळून पडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात 10 हजार 712 हेक्टरमध्ये संत्र्याचे पिक घेतले जाते. यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतात आंबिया बहाराच्या संत्रा चांगल्या प्रमाणात होईल म्हणून शेतकरी खूप सुखावला होता. मात्र मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. यापूर्वी कशा प्रकारची गळती कधीही बघितली नसल्याचे शेतकरी सांगतात.

हेही वाचा -विदर्भ शासन! महाराष्ट्र दिनी फलकांवर झळकले 'विदर्भ शासन'; महाराष्ट्र दिनाचा नोंदवला निषेध

ABOUT THE AUTHOR

...view details