महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : पाईपलाईन दुरुस्तीमुळे शहराला महिनाभर एक दिवसाआड पाणीपुरवठा

पेंच कालव्यातून नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी मध्ये मोठ्या प्रमाणात गळती असल्याने आज पासून नागपूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. जलाशयांमध्ये भरपूर पाणी शिल्लक असले तरी पाणी वाहून आणणाऱ्या २३०० मिलिमीटरच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे.

By

Published : Jan 6, 2021, 4:19 PM IST

नागपूर पाणीपुरवठा न्यूज
नागपूर पाणीपुरवठा न्यूज

नागपूर - पेंच कालव्यातून नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी मध्ये मोठ्या प्रमाणात गळती असल्याने आज पासून नागपूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. याचा फटका शहरातील ६५ टक्के भागाला बसणार आहे. सर्व १० झोन मधील बराचसा भाग यात समाविष्ट आहे. पेंचमधून येणाऱ्या २७ किलोमीटर इटगाव ते करमभाड या गावादम्यान या जलवाहिनीत २३०० मिलिमीटर आकाराचा व्यास असलेल्या ठिकाणी सर्वाधिक गळती आहे. त्यामुळे रोज ५ MLD पाणी वाया जात आहे. याचा फटका उन्हाळ्यात बसू शकतो. त्यामुळे ही दुरुस्ती हातात घेतल्याची माहिती OCW चे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी दिली आहे.

पाईपलाईन दुरुस्तीमुळे शहराला महिनाभर एक दिवसाआड पाणीपुरवठा

ऐन हिवाळ्यात नागपूरकरांवर पाणी संकट ओढवले आहे. हे पाणी संकट नैसर्गिक नसून कृत्रिम आहे. नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय समितीच्या निर्णयानुसार आजपासून पुढील एक महिना नागपूरकरांसाठी एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. नागपूरला पाणी पुरवठा होणाऱ्या जलाशयांमध्ये भरपूर पाणी शिल्लक असले तरी पाणी वाहून आणणाऱ्या २३०० मिलिमीटरच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आजपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरवात झाल्याची माहिती शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी दिली.

हेही वाचा -ग्रामपंचायत निवडणूक : अपहरण करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले; चौघांविरुद्ध गुन्हा

गळती वाढल्यानेच पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

पेंच धरणातून नागपूरला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, गळती वाढल्याने वारंवार पाणीपुरवठा प्रभावित होत आहे. ही गळती काढण्यासाठी दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे. योग्य वेळी दुरुस्ती झाली नाही तर उन्हाळ्यात भीषण पाणी संकटाला तोंड द्यावे लागू शकेल. यामुळेच ज्यावेळी हिवाळ्यात पाण्याची मागणी असते, त्यावेळीच ही दुरुस्ती करणे महत्त्वाचे असल्याने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.


पाणी जपून वापरा

मनपाच्या सर्व दहा जोडमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी आणि जपून वापरावे, असे आवाहन जलप्रदाय समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ओसीडब्ल्यूकडूनदेखील या संदर्भात जनजागृती केली जात आहे. नागरिक भविष्याच्या नियोजनासाठी सहकार्य करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -पश्चिम विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज; १० तारखेनंतर वाढणार थंडी..

ABOUT THE AUTHOR

...view details