महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 1, 2019, 7:06 AM IST

ETV Bharat / state

जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून वंचित फोडणार प्रचाराचा नारळ

दादर येथील आंबेडकर भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची दुसरी ११२ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात त्यांनी धनगर, मराठा, कुणबी आणि इतर समाजाचे उमेदवार दिले असून त्यात सर्वात मोठ्या आणि अल्प समाजालाही स्थान देण्यात आले आहे.

जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून वंचित फोडणार प्रचाराचा नारळ

मुंबई - राजमाता जिजाऊ यांच्या पाचड येथील समाधी स्थळाला अभिवादन करून वंचित बहुजन आघाडी ३ ऑक्टोबरला आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. तर पहिली प्रचार सभा ही महाड येथे होणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी मुंबईत केली. जिजाऊंच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करून अभिवादन करून महाड येथील चवदार तळ्यावर अभिवादन करून पहिली प्रचार सभा घेतली जाणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून वंचित फोडणार प्रचाराचा नारळ

हे ही वाचा -'वंचित' कडून परभणी जिल्ह्यातील चारही उमेदवार जाहीर; नवख्यांना संधी देऊन दिला धक्का

दादर येथील आंबेडकर भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची दुसरी ११२ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात त्यांनी धनगर, मराठा, कुणबी आणि इतर समाजाचे उमेदवार दिले असून त्यात सर्वात मोठ्या आणि अल्प समाजालाही स्थान देण्यात आले आहे. यामुळे आम्ही वंचितांना प्राधान्य दिले आहे. धनदांडगे आणि घराणेशाही असलेल्या एकाही उमेदवाराला आम्ही उमेदवारी दिली नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. राज्यात आज आमची खरी लढाई ही सेना भाजप यांच्याशी असल्याचा दावा करत आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे विरोधक म्हणून शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे आमचा एकच पक्ष हा विरोधक म्हणून शिल्लक असल्याचे विधान त्यांनी केले.

हे ही वाचा -आघाडीच्या उमेदवाराचे नाव वंचितच्या यादीत; राजकीय क्षेत्रात खळबळ

सेना भाजपा यांनी राज्यात असलेल्या प्रश्नावर निवडणूक न लढवता ते जात, धर्म आणि कलम ३७० घेऊन समोर येत आहेत. यामुळे अशा लोकांपासून राज्यातील जनतेने सावध व्हावे. असे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्यांनी आज राज्यात बँका बुडवल्या त्या आणि उरलेल्या बँका वाचल्या पाहिजेत. विरोधीपक्ष जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी वंचित सोबत यावे. असे आवाहन त्यांनी केले. राज्यात केवळ आमचा एकच पक्ष आहे. जो २८८ जागा लढत आहे. इतर सर्व पक्ष हे अर्ध्या आणि त्याहून कमी जागा लढत असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details