महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टॅक्सीचालकांनी भाडं नाकारल्यास करा तक्रार.. होणार कठोर कारवाई

अनेकदा भाडे नाकारल्याने एखादी व्यक्तीला आपल्या कामाच्या ठिकाणी, रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होत असतो. मात्र, बेफिकीर असणारे टॅक्सीचालक भाडे नाकारुन प्रवाशांचा अपमान करण्याचे काम सातत्याने करत असतात. त्यांच्या या उद्दामपणाला आळा घालण्यासाठीच आरटीओने ही भूमिका स्वीकारली आहे.  अशा मुजोर टॅक्सी वाल्यांचा विरोधात भाडं नाकरल्याची तक्रार करता येऊ शकते.

By

Published : Apr 16, 2019, 12:33 PM IST

टॅक्सीचालकांनी भाडं नाकारल्यास करा तक्रार.. होणार कठोर कारवाई

मुंबई -शहरात टॅक्सीचालक मोठ्या प्रमाणात मनमानी करतात आणि भाडं नाकारतात. आता भाडं नाकारल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असे आरटिओ कार्यालयांनी स्पष्ट केले आहे. अनेकदा काही कामानिमित्त जाण्यासाठी प्रवासी काळी पिवळी टॅक्सी बोलावतो. मात्र, टॅक्सीचालक आपल्या नेहमीच्या तोर्‍यात प्रवाशांचे भाडे नाकारत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी आरटीओकडे केल्या होत्या. किरकोळ दंड आकारुन त्यांच्यावर कारवाई होत असे. मात्र, किरकोळ कारवाईला टॅक्सीचालक दाद देत नसल्याचे आरटीओच्या ध्यानात आल्याने आता कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

टॅक्सीचालकांनी भाडं नाकारल्यास करा तक्रार.. होणार कठोर कारवाई

अनेकदा भाडे नाकारल्याने एखादी व्यक्तीला आपल्या कामाच्या ठिकाणी, रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होत असतो. मात्र, बेफिकीर असणारे टॅक्सीचालक भाडे नाकारुन प्रवाशांचा अपमान करण्याचे काम सातत्याने करत असतात. त्यांच्या या उद्दामपणाला आळा घालण्यासाठीच आरटीओने ही भूमिका स्वीकारली आहे. अशा मुजोर टॅक्सी वाल्यांचा विरोधात भाडं नाकरल्याची तक्रार करता येऊ शकते.

अशाच नियम लागू करून वडाळा येथील आरटीओमने नुकतेच रिक्षा-टॅक्सीच्या ९९९ तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारींपैकी ४८५ तक्रारी वडाळा आरटीओ यांनी निकाली काढल्या आहेत. कारवाई करत असताना ४९५ लायसन्स त्यांनी रद्द केले आहेत. ९९९ तक्रारींमध्ये ७०८ रिक्षाचालक आणि २९१ मीटर टॅक्सी यांचा समावेश आहे. चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वडाळा आरटीओने दोषी चालकांकडून १२ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ताडदेव आरटीओने आतापर्यंत ७ लाख ५२ हजार ७०० रुपये दोषी चालकांकडून वसूल करण्यात आले आहेत. अशी माहिती हा नियम लागु झाल्यानंतर एका पत्रकात अरटीओने सांगितले आहे.

नागरिकांना टॅक्सीचालकांच्या उद्दामपणाचा आणि मग्रुरीचा अनुभव नित्याचाच झाला आहे. मात्र, आता मुंबई शहरातील टॅक्सी चालक कोणतेही भाडे नाकारु शकत नाहीत, तसे झाल्यास त्याचा परवानाच रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे आपोआपच त्याची मग्रुरी थांबली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालकाने भाडे नाकारल्यास त्याची तक्रार आरटीओने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर दाखल करणे आवश्यक आहे. आरटीओकडून अशा तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाणार असल्याचे आरटीओकडून माहिती मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details