महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवरे धरण फुटीची विशेष पथकाकडून चौकशी होणार, २ महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

अतिवृष्टीमुळं चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

By

Published : Jul 7, 2019, 9:06 AM IST

तिवरे धरण

मुंबई - अतिवृष्टीमुळं चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या निर्णयानुसार, २ महिन्यात याप्रकरणी चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकास देण्यात आले आहेत.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण २ जुलैला फोटले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य आहेत.

काय आहे विशेष चौकशी पथकाची जाबाबदारी?

तिवरे धरण फुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे. त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे, लघुसिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, मालगुजारी तलाव व इतर तत्सम तलावांबाबतीत भविष्यात, अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना सुचविणे ही या चौकशी पथकाची जबाबदारी असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details