महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 27, 2019, 5:18 PM IST

ETV Bharat / state

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळांचा नाही - मुनगंटीवार

तब्बल २५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तर सुरिंदर अरोरा यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, विरोधक यामध्ये राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई - राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. हे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा नाही तर उच्च न्यायालयाचा आहे, असा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला आहे. योगा योग साधला म्हणून विरोधक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत आहेत, असेही ते म्हणाले.

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण : गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळांचा नाही - मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला

तब्बल २५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तर सुरिंदर अरोरा यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, विरोधक यामध्ये राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. आगामी विधानसभेच्या जागा वाटपाचा सेना-भाजप इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, माध्यमांच्या माध्यमातून ही अस्वस्थता वाढत आहे. तर सेना-भाजप युती होईल आणि जनतेच्या हिताचे सरकार येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधील स्मारक वादावर बोलताना ते म्हणाले, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. काही तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आणि राज्य सरकार याकडे लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर औरंगाबाद बोगस खते प्रकरणी गुन्हा दाखल होणे हा प्रक्रियेचा भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details