महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 15, 2019, 11:37 PM IST

ETV Bharat / state

'स्वतःची कातडी वाचवण्यासाठी त्यांनी पक्षबद्दल केले'

नुकताच नवी मुंबईत शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेले पळपुटेपणाची भूमिका घेत असतील तर, लोकच त्यांचा समाचार घेतील. १९८५ च्या निवडणुकीत सहाचे साठ आमदार करून दाखविले होते. दिग्गज नेते बाहेर पडत असले तरी तरुण कार्यकर्ते तेवढ्याच उत्साहात पुढे येत आहेत.

शरद पवार

मुंबई -नुकतंच हातावरच घड्याळ बाजूला काढत भाजपचे कमळ हाती घेतलेले साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर शरद पवार यांनी नाव न घेता सडकून टीका केली आहे. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पक्षबदल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, जे राष्ट्रवादी सोडून गेलेत त्यांच्या जाण्याने पक्षाला काहीही फरक पडणार नसल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार

हेही वाचा -बारामतीत काय कलम ३७० लागू आहे का? - मुख्यमंत्री

नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या भाजप पक्षांतरानंतर राष्ट्रवादीची सत्ता मजबूत करण्यासाठी आता राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी नवी मुंबईत जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. नुकताच नवी मुंबईत शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेले पळपुटेपणाची भूमिका घेत असतील तर, लोकच त्यांचा समाचार घेतील. १९८५ च्या निवडणुकीत सहाचे साठ आमदार करून दाखविले होते. दिग्गज नेते बाहेर पडत असले तरी तरुण कार्यकर्ते तेवढ्याच उत्साहात पुढे येत आहेत. यानिमित्ताने तरुणांना अधिक संधी देता येईल.

हेही वाचा -बीडमध्ये फुटणार राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ, पक्ष पडझडीच्या काळात पवारच मैदानात

देशात महागाई, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न निर्माण झाले असून सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले असल्याची टीकाही पवार यांनी केली. शरद पवार कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे आदी हजर होते. त्या

ABOUT THE AUTHOR

...view details