महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मोफत रिचार्ज ही अफवा, संबंधितांवर कारवाईची शरद पवारांची मागणी

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर रिचार्ज करुन दिला जाईल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे शरद पवार म्हणाले.

By

Published : Jul 25, 2019, 10:16 AM IST

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची शरद पवारांची मागणी

मुंबई -राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांच्या मोबाईलवर माझ्यातर्फे मोफत रिचार्ज करून दिला जाईल, अशी अफवा सोशल माध्यमांवरुन पसरवली जात आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून काही समाजकंटकांनी पीडित शेतकऱ्यांची केलेली ही क्रूर चेष्टा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. असे कृत्य करणाऱ्यांवर सायबर यंत्रणेने तत्काळ कारवाई करावी, असे पवार म्हणाले.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर रिचार्ज करुन दिला जाईल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही पवार म्हणाले. असे कृत्य करणाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचेही पवार म्हणाले. याप्रकरणी सायबर यंत्रणेने तत्काळ तपास करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शरद पवार यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details