महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुस्लिम असल्यानेच त्यांना भारतात येण्यास परवानगी नाही'

ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेत आहेत. समाजातील पिछाडलेल्या वर्गाकडे केंद्र सरकारचे लक्ष नसल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.

By

Published : Jan 24, 2020, 8:17 AM IST

sharad pawar comment on bjp
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद

मुंबई -ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेत आहेत. समाजातील पिछाडलेल्या वर्गाकडे केंद्र सरकारचे लक्ष नसल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. सरकारने पिछाडलेल्या वर्गासाठी काम करणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले. तसेच भारतातल्या नातेवाईकांना भेटण्याची पाकिस्तानच्या मुस्लिमांची इच्छा आहे. मात्र, ते मुस्लीम असल्याने त्यांना भारतात येण्यास परवानगी नसल्याचे पवार म्हणाले.

क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होतो. तेव्हा असे अनेक लोक मला भेटले की, त्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की, त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी व्हाव्यात. पण केवळ ते मुस्लीम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी नसल्याचे पवार म्हणाले.

जो भटका असेल त्याची नोंद असेल का?

जनगणनेत प्रत्येकाच्या जन्माची नोंद करण्याचा निर्णय होत आहे. जन्म झालेल्या गावाची देखील नोंद होईल, असे पाहण्यात येत आहे. पण जो भटका समाज आहे त्याच्या जन्माची कोणती नोंद असेल का? त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल का? नाहीतर त्याच्यावर अन्याय होणार आहे, असे सवालही पवार यांनी उपस्थित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details