मुंबई- कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सिनेमागृहे बंद आहेत. त्यामुळे काही चित्रपट ओटीटी व्यासपीठावर प्रदर्शित होणार आहे. यामुळे चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रदर्शनकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यावर अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या पूजा भट्ट यांनी विचित्रपणे आपले मत व्यक्त केले आहे.
या काळात चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रदर्शनकर्ते यांच्यातील युद्ध हे म्हणजे दोन टक्कल माणसे कंगव्यासाठी लढत असल्यासारखे असून यात प्रेक्षक कुठे आहे? असा सवाल पूजा भट्ट यांनी ट्विटरवर केला आहे. पूजा यांचे ट्विट नेटिझन्सला हसवून सोडत आहे.