महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Political Leader Reaction : शिवराज पाटील यांच्या वादग्रस्त विधानावर भाजपसह हिंदू महासभेचे नेते संतप्त, म्हणाले...

सोनिया गांधींच्या मर्जीतील नेते कायम हिंदू समाजाचा अपमान करत आले (Shivraj patil controversial statement) आहेत.

By

Published : Oct 21, 2022, 11:22 AM IST

Updated : Oct 21, 2022, 1:49 PM IST

Political Leader Reaction
राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

मुंबई :सोनिया गांधींच्या मर्जीतील नेते कायम हिंदू समाजाचा अपमान करत आले (Shivraj patil controversial statement) आहेत. हिंदू दहशतवाद, भगवा दहशतव अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यात भगवद् गीतेच्या तत्वज्ञानाची (controversial statement on Bhagwat geeta) जिहादशी तुलना करुन शिवराज पाटील यांनी भर टाकली आहे. काँग्रेसने माफी मागावी अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर (Political Leader Reaction) उतरेल, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

आनंद दवेंचा घणाघात :शिवराज पाटील यांचं विधान म्हणजे मूर्खपणाचे लक्षण असे हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी गुरुवारी वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते, की जिहाद (किंवा धार्मिक युद्ध) या विषयावर बरीच चर्चा होत असताना, कुराण आणि भगवद्गीतेतही या विषयाचा उल्लेख आढळतो. ते म्हणाले होते की, महाभारतातील गीतेच्या एका भागात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला जिहादचे धडे दिले आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील हिंदू संघटना आक्रमक झाले असून शिवराज पाटील यांच्या विधनाचा निषेध करत आहे. पुण्यातील हिंदू महासभेकडून देखील पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की- पाटील यांच्याकडे कोणती भागवत गिता आहे. हे त्यांनाच माहीत आहे. त्यांचं वक्तव्य हे त्यांच्या वयानुसार केलेलं आहे. माणसाच्या मेंदूवर परिणाम झाला का माणूस असे वक्तव्य करत असतो, अशी टीका यावेळी दवे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया देताना हिंदू महासभा अध्यक्ष आनंद दवे

वादग्रस्त विधान :काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी गुरुवारी वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते, की जिहाद (किंवा धार्मिक युद्ध) या विषयावर बरीच चर्चा होत असताना, कुराण आणि भगवद्गीतेतही या विषयाचा उल्लेख आढळतो. ते म्हणाले होते की, महाभारतातील गीतेच्या एका भागात भगवान श्रीकृष्णाने ( Shivraj Patil Bhagwat Geeta ) अर्जुनला जिहादचे धडे दिले आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

शिवराज पाटीलांचे वक्तव्य :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई ( Mohsina Kidwais biography ) यांच्या जीवनचरित्राच्या लोकार्पण सोहळ्याला शिवराज पाटील बोलत होते. यावेळी पक्षाचे खासदार शशी थरूर, सुशीलकुमार शिंदे आणि मणिशंकर अय्यरही ( Mani Shankar Aiyar ) उपस्थित होते.शिवराज पाटील म्हणाले होते, की जिहादची संकल्पना केवळ इस्लाममध्ये नाही, तर भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे. पाटील यांनी दावा केला होता, केवळ कुराणातच नाही तर महाभारत, गीता, श्रीकृष्ण अर्जुनाशीही जिहादविषयी बोलतात. ही गोष्ट केवळ कुराण किंवा गीतेतच नाही तर ख्रिश्चन धर्मातही आहे.

Last Updated : Oct 21, 2022, 1:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details