महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawars Retirement: पक्षातील अस्वस्थता संपवण्यासाठी निर्णय, राजकीय विश्लेषकांचे मत

By

Published : May 2, 2023, 8:20 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पाय उतार होण्याचा घेतलेला निर्णय हा वाढतं वयमान आणि प्रकृतीच्या दृष्टीने आहे. असे सांगितले जात असले तरी, पक्षांतर्गत असलेली अस्वस्थता आणि पक्षविरोधी कारवाया थांबवण्यासाठी उचललेले पाऊल असावे असे मत, राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Sharad Pawars Retirement News
राजकीय तज्ञांनी व्यक्त केले मत

राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी माहिती देताना

मुंबई: राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप घडवून आणण्यात शरद पवारांचा हातखंडा आहे. शरद पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पाय उतार होत असल्याचे जाहीर करत, आणखी एकदा धक्का पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र शरद पवारांचा हा निर्णय केवळ वैयक्तिक नव्हे तर, राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.


पवारांचा राजीनामा राजकीय स्फोट: यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले की, शरद पवार यांच्या राजीनामा राष्ट्राध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय मोठी आणि अतिशय धक्कादायक स्फोटक अशी घटना आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात मोठा स्फोट होईल असे जे अनेक नेते सांगत होते. त्यापैकी हा एक स्फोट आहे. असे आपल्याला म्हणायला हरकत नाही. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अशा प्रकारचे भाकीत केले होते की, एक स्फोट दिल्लीत होईल आणि एक स्फोट मुंबई होईल. असे म्हटल्याचे जोशी यांनी सांगितले आहे.



अजित पवार व सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया नाही: शरद पवार यांनी वयोमानानुसार आणि प्रकृतीच्या इतर कारणांमुळे जर हा निर्णय घेतला असेल तर तो योग्य आहे, असे आपल्याला मानावे लागेल. एक मे 1960 पासून आपण राजकारणात आहोत. बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे त्यांनी म्हटले आहे, त्याचबरोबर सामाजिक कामातून आपण बाहेर पडणार नाही. आपल्या विविध संस्थांची काम आपण याच ताकतीने करत राहू विविध समाज घटकांना न्याय देण्याचा काम करत राहू असेही शरद पवार यांनी सांगितले आहे. परंतु साहजिकच राष्ट्रवादीमध्ये फार मोठ्या प्रमाणात खळबळ माजलेली आहे. नेते हे पवार साहेबांनी राजीनामा देऊ नये. सुप्रिया सुळे आणि त्यांचे बंधू अजित पवार या दोघांनीही प्रत्यक्षात कोणतीच प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली नाही, याकडे अनिकेत जोशी यांनी लक्ष वेधले. अन्य नेत्यांनी मात्र शरद पवार यांना आम्ही सोडणार नाही त्यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊ नये, त्यांची मनधरणी करू आणि कार्यकर्त्यांच म्हणण त्यांना ऐकावे लागेल अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.


पक्षांतर्गत अस्थिरतेमुळे निर्णय: या सगळ्याच्या घटना आहेत शरद पवार कुठलीच गोष्ट ही अचानकपणे किंवा न ठरवता अशा प्रकारे करत नाहीत. आपल्याला ती तशी जाणवते की, त्यांनी पूर्ण विचारांती हे पाऊल उचललेलं असणार यात कोणतीच शंका नाही. ते सगळे मार्ग आता अचानक बंद झाल्याचे त्यांना जाणवेल कार्यकर्त्यांचा प्रभाव आणि कार्यकर्त्यांचा एक आंदोलनाची भूमिका आहे. त्यामुळे त्यांना एवढ्यात कोणताच राजकीय निर्णय घेणे शक्य होणार नाही. जर राष्ट्रीय अध्यक्ष स्तरावरती कोणाची नेमणूक करायची असेल तर ती प्रफुल्ल पटेल यांची होण्याची शक्यता आहे. कारण शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रीय स्तरावर गेली अनेक वर्ष पटेल काम करीत आहेत. असेही जोशी यांनी सांगितले.



पक्षातील अंतर्विरोधाला शह: दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितले की, शरद पवार यांनी यानिमित्ताने पक्षातील अंतर्विरोधालाच शह देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी राजकारणामध्ये सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यात उत्तराधिकारी कोण यावरून जपणार आहे. तर अजित पवार हे वारंवार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चा थांबल्या जाव्यात आणि आगामी नेतृत्व ठरवताना ते अन्य अध्यक्षांच्या मताने ठरवले जावे, त्याचे खापर आपल्या डोक्यावर येऊ नये, यासाठी पवारांनी अशा पद्धतीचे पाऊल उचलले असल्याचे भावसार यांचे म्हणणे आहे. यामुळे पक्षविरोधी कारवाया आणि भाजपासोबत जाण्याच्या हालचालींना काही काळ खीळ लागणार आहे, असेही भावसार म्हणाले.

हेही वाचा: Sharad Pawar Retirement शरद पवारांचा अध्यक्षपदावरुन निवृत्तीचा निर्णय जयंत पाटील जितेंद्र आव्हाड ढसाढसा रडले

ABOUT THE AUTHOR

...view details