महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुट्टीला जा पण मतदानाला मुंबईत या; आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचे आवाहन

मतदानाचा टक्का वाढला पाहिजे सर्वांनी मतदान केले पाहिजे, हाच उद्देश घेऊन मुलुंड व परिसरातील तरुणांनी मुंबईकरांनी मतदान केले पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला आहे.

By

Published : Apr 27, 2019, 11:10 AM IST

सुट्टीला जा पण मतदानाला मुंबईत या

मुंबई - महाराष्ट्रातील चौथ्या व अंतिम टप्यासाठी सोमवार २९ एप्रिलला मुंबईत मतदान होणार आहे. त्याचवेळी सलग सुट्या असल्याने मुंबईकर मुंबई बाहेर जाण्याची शक्यता आहे. मतदाता जागृती मंच व स्वामी विवेकानंद शाखा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातर्फे मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यावर मतदाता जागृती अभियान राबविण्यात येत आहे. यात तरुण आपल्या हातात राष्ट्र ध्वज आणि मतदान करण्याचे फलक हातात घेऊन जागृती निर्माण करीत आहेत.

सुट्टीला जा पण मतदानाला मुंबईत या

देशात लोकशाही आणि सक्षम सरकार स्थापन करण्यासाठी सर्व नागरिकांनी मतदान केले पाहिजे, यासाठी निवडणूक आयोग सामाजिक संघटना, संस्था विचारवंत आणि उमेदवार जनतेला आवाहन करीत असतात. मतदानाचा टक्का वाढला पाहिजे सर्वांनी मतदान केले पाहिजे, हाच उद्देश घेऊन मुलुंड व परिसरातील तरुणांनी मुंबईकरांनी मतदान केले पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला आहे.

यावेळी विविन शॉन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणाले, आम्ही मुलुंडच्या टोल नाक्यावर मतदारांना आवाहन करीत आहोत, तुम्ही सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आवश्य मुंबई बाहेर जा पण येणाऱ्या २९ तारखेला पाच मिनिटांचा वेळ काढून मतदान करण्यासाठी मुंबईत परत या आणि आपल्या देशात लोकशाही मजबुतीसाठी मतदान करा, प्रत्येकांनी मतदान केले पाहिजे, हीच मुंबईकरांकडून आम्हाला अपेक्षा आहे. आयआयटी मुंबईचा विद्यार्थी नारायण गावडे 'ईटीव्ही भारत'ला बोलताना म्हणाला, सुटीचा आनंद घेण्यासाठी बाहेर जात आहात. पण नको ते निवडणुकीत निवडून आले तर तुमची विकेट जाणार त्यामुळे सर्वांनी मतदान करणे आवश्यक आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मतदाता जागृती अभियानाचे नारायण गावडे, वचन पोतमुरी, गणेश रामकृष्णन गिरीराज बागला इतर १२ लोक मुलुंडच्या टोलनाक्यावर हातात फलक राष्ट्र ध्वज घेऊन मतदाता जागृती कार्य करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details