महाराष्ट्र

maharashtra

'...पण सुशांतच्या मृत्यू प्रकरणात 65 दिवस गुन्हा दाखल का झाला नाही?'

रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेत सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार केली त्यावरून दोन तासांतच सुशांतसिंह राजपूतच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल झाला. यावरुन भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता सरकारवर टीका केली आहे.

By

Published : Sep 10, 2020, 3:56 PM IST

Published : Sep 10, 2020, 3:56 PM IST

अ‌ॅड. आशिष शेलार
अ‌ॅड. आशिष शेलार

मुंबई -सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन अनेक दिवसांपासून वाद विवाद पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे नेते मंडळी महाविकास आघाडीतील नेत्यांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीका करत आहेत. त्यात भाजप नेते आशिष शेलार यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे व महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, रियाने अटकेच्या वेळेस वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दोन तासात सुशांतसिंह राजपूतच्या बहिणी विरोधात गुन्हा दाखल झाला. पण, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात 65 दिवस गुन्हा दाखल का झाला नाही?, रियाला हे कोण सांगत आहे?, ड्रग्ज, पब आणि पार्टी गँग?, असे ट्वीट करत आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता टीका केली आहे.हेही वाचा -कंगनाचा बोलविता धनी कोण? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details